शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेवरील हल्ले थांबवण्याची सर्वाधिक जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसवरच - कुमार केतकर

By राजू इनामदार | Updated: December 6, 2024 19:05 IST

देश स्वतंत्र झाल्यापासून संपुर्ण काळ काँग्रेसने घटनानिर्मितीसाठी आणि ती तयार झाल्यानंतर टिकवून ठेवण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे

पुणे: राज्यघटना हा देशाचा आत्मा आहे. संस्थाने, प्रांत यात विखुरलेला देश राज्यघटनेनेच एकसंध केला. तो तसाच ठेवायचा असेल तर प्रथम राज्यघटनेवरील हल्ले थांबवायला हवेत. याची सर्वाधिक जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसवरच आहे असे प्रतिपादन राज्यसभेची माजी खासदार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.

सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारले त्याचे स्मरण म्हणून काँग्रेसच्या वतीने २ ते ९ डिसेंबरदरम्यान साजऱ्या करण्यात येणाऱ्या सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताहात शुक्रवारी केतकर यांची राज्यघटना या विषयावर व्याख्यान झाले. संविधान रक्षक पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. गांधी विचारांचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य संयोजक मोहन जोशी, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरिक्षक विकास पासलकर व्यासपीठावर उपस्थित होते.

केतकर यांनी घटनानिर्मितीपासूनचा विस्ताराने आढावा घेत देशाच्या संबधात राज्यघटनेचे महत्व विषद केले. महात्मा गांधी, पंडित नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच देशात घटनानिर्मिती झाली. तोपर्यंत देश वेगवेगळ्या प्रातांमध्ये, ५६५ संस्थानांमध्ये विखूरलेला होता. गांधींनीच डॉ. आंबेडकर यांचे नाव घटनानिर्मितीसाठी सुचवले. प्रत्येक प्रांतातून प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार झाली. त्यांच्या सुचना स्विकारल्यानंतर एक सलग अशी राज्यघटना अस्तित्वात आली. तिचा मुळ पायाच समाजवाद व धर्मनिरपेक्षता हा आहे. त्यालाच धक्का लावण्याचा प्रयत्न आज केला जात आहे, कारण त्यांच्या मुळ अजेंड्यातील विचारांना त्याचा अडथळा आहे.

देशाने राज्यघटनेचा स्विकार १९४९ मध्ये केला. घटनेप्रमाणे पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ मध्ये झाली. या दरम्यानच्या काळात केंद्राने स्थापन केलेला निवडणूक आयोग निवडणुकीची तयारी करत होता. या संपुर्ण काळात काँग्रेसने घटनानिर्मितीसाठी, ती तयार झाल्यानंतर टिकवून ठेवण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे आता कोणी घटनेला, त्यातील मुलतत्वांना धक्का लावायचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची, ते थांबवण्याची सर्वात जास्त जबाबदारी काँग्रेसचीच आहे असे केतकर म्हणाले.

मोहन जोशी यांनी प्रास्तविक केले. केतकर यांच्या हस्ते ॲड. रमा सरोदे, विठ्ठलराव गायकवाड, प्रशांत धुमाळ, मिलिंद अहिरे यांना संविधान रक्षक पुरस्कार देण्यात आला. प्रथमेश आबनावे यांनी सुत्रसंचालन केले. नाना करपे यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर