शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

राज्यघटनेवरील हल्ले थांबवण्याची सर्वाधिक जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसवरच - कुमार केतकर

By राजू इनामदार | Updated: December 6, 2024 19:05 IST

देश स्वतंत्र झाल्यापासून संपुर्ण काळ काँग्रेसने घटनानिर्मितीसाठी आणि ती तयार झाल्यानंतर टिकवून ठेवण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे

पुणे: राज्यघटना हा देशाचा आत्मा आहे. संस्थाने, प्रांत यात विखुरलेला देश राज्यघटनेनेच एकसंध केला. तो तसाच ठेवायचा असेल तर प्रथम राज्यघटनेवरील हल्ले थांबवायला हवेत. याची सर्वाधिक जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसवरच आहे असे प्रतिपादन राज्यसभेची माजी खासदार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.

सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारले त्याचे स्मरण म्हणून काँग्रेसच्या वतीने २ ते ९ डिसेंबरदरम्यान साजऱ्या करण्यात येणाऱ्या सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताहात शुक्रवारी केतकर यांची राज्यघटना या विषयावर व्याख्यान झाले. संविधान रक्षक पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. गांधी विचारांचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य संयोजक मोहन जोशी, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरिक्षक विकास पासलकर व्यासपीठावर उपस्थित होते.

केतकर यांनी घटनानिर्मितीपासूनचा विस्ताराने आढावा घेत देशाच्या संबधात राज्यघटनेचे महत्व विषद केले. महात्मा गांधी, पंडित नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच देशात घटनानिर्मिती झाली. तोपर्यंत देश वेगवेगळ्या प्रातांमध्ये, ५६५ संस्थानांमध्ये विखूरलेला होता. गांधींनीच डॉ. आंबेडकर यांचे नाव घटनानिर्मितीसाठी सुचवले. प्रत्येक प्रांतातून प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार झाली. त्यांच्या सुचना स्विकारल्यानंतर एक सलग अशी राज्यघटना अस्तित्वात आली. तिचा मुळ पायाच समाजवाद व धर्मनिरपेक्षता हा आहे. त्यालाच धक्का लावण्याचा प्रयत्न आज केला जात आहे, कारण त्यांच्या मुळ अजेंड्यातील विचारांना त्याचा अडथळा आहे.

देशाने राज्यघटनेचा स्विकार १९४९ मध्ये केला. घटनेप्रमाणे पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ मध्ये झाली. या दरम्यानच्या काळात केंद्राने स्थापन केलेला निवडणूक आयोग निवडणुकीची तयारी करत होता. या संपुर्ण काळात काँग्रेसने घटनानिर्मितीसाठी, ती तयार झाल्यानंतर टिकवून ठेवण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे आता कोणी घटनेला, त्यातील मुलतत्वांना धक्का लावायचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची, ते थांबवण्याची सर्वात जास्त जबाबदारी काँग्रेसचीच आहे असे केतकर म्हणाले.

मोहन जोशी यांनी प्रास्तविक केले. केतकर यांच्या हस्ते ॲड. रमा सरोदे, विठ्ठलराव गायकवाड, प्रशांत धुमाळ, मिलिंद अहिरे यांना संविधान रक्षक पुरस्कार देण्यात आला. प्रथमेश आबनावे यांनी सुत्रसंचालन केले. नाना करपे यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर