शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

राज्यघटनेवरील हल्ले थांबवण्याची सर्वाधिक जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसवरच - कुमार केतकर

By राजू इनामदार | Updated: December 6, 2024 19:05 IST

देश स्वतंत्र झाल्यापासून संपुर्ण काळ काँग्रेसने घटनानिर्मितीसाठी आणि ती तयार झाल्यानंतर टिकवून ठेवण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे

पुणे: राज्यघटना हा देशाचा आत्मा आहे. संस्थाने, प्रांत यात विखुरलेला देश राज्यघटनेनेच एकसंध केला. तो तसाच ठेवायचा असेल तर प्रथम राज्यघटनेवरील हल्ले थांबवायला हवेत. याची सर्वाधिक जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसवरच आहे असे प्रतिपादन राज्यसभेची माजी खासदार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.

सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारले त्याचे स्मरण म्हणून काँग्रेसच्या वतीने २ ते ९ डिसेंबरदरम्यान साजऱ्या करण्यात येणाऱ्या सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताहात शुक्रवारी केतकर यांची राज्यघटना या विषयावर व्याख्यान झाले. संविधान रक्षक पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. गांधी विचारांचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य संयोजक मोहन जोशी, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरिक्षक विकास पासलकर व्यासपीठावर उपस्थित होते.

केतकर यांनी घटनानिर्मितीपासूनचा विस्ताराने आढावा घेत देशाच्या संबधात राज्यघटनेचे महत्व विषद केले. महात्मा गांधी, पंडित नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच देशात घटनानिर्मिती झाली. तोपर्यंत देश वेगवेगळ्या प्रातांमध्ये, ५६५ संस्थानांमध्ये विखूरलेला होता. गांधींनीच डॉ. आंबेडकर यांचे नाव घटनानिर्मितीसाठी सुचवले. प्रत्येक प्रांतातून प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार झाली. त्यांच्या सुचना स्विकारल्यानंतर एक सलग अशी राज्यघटना अस्तित्वात आली. तिचा मुळ पायाच समाजवाद व धर्मनिरपेक्षता हा आहे. त्यालाच धक्का लावण्याचा प्रयत्न आज केला जात आहे, कारण त्यांच्या मुळ अजेंड्यातील विचारांना त्याचा अडथळा आहे.

देशाने राज्यघटनेचा स्विकार १९४९ मध्ये केला. घटनेप्रमाणे पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ मध्ये झाली. या दरम्यानच्या काळात केंद्राने स्थापन केलेला निवडणूक आयोग निवडणुकीची तयारी करत होता. या संपुर्ण काळात काँग्रेसने घटनानिर्मितीसाठी, ती तयार झाल्यानंतर टिकवून ठेवण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे आता कोणी घटनेला, त्यातील मुलतत्वांना धक्का लावायचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची, ते थांबवण्याची सर्वात जास्त जबाबदारी काँग्रेसचीच आहे असे केतकर म्हणाले.

मोहन जोशी यांनी प्रास्तविक केले. केतकर यांच्या हस्ते ॲड. रमा सरोदे, विठ्ठलराव गायकवाड, प्रशांत धुमाळ, मिलिंद अहिरे यांना संविधान रक्षक पुरस्कार देण्यात आला. प्रथमेश आबनावे यांनी सुत्रसंचालन केले. नाना करपे यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर