शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षेवर पर्याय निघत नसल्याने पालक-विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

दर वर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा होऊन जातात. मात्र, यंदा कोरोनाचा कहर वाढल्याने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, ...

दर वर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा होऊन जातात. मात्र, यंदा कोरोनाचा कहर वाढल्याने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. सुरुवातीला मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात परीक्षा घेतल्या जातील असे घोषित करण्यात आले होते. परंतु मे संपला, तरी अजूनही शासन स्तरावर कोणताही निर्णय घेतला नाही. शिक्षणतज्ज्ञांच्या मते बारावीची परीक्षा ऑनलाइन घेणे कठीण असल्याने ऑफलाइनच घ्यावी, अशी मागणी होत आहे. परीक्षा केव्हा होतील आणि त्या कशा पद्धतीने घेतल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तोपर्यंत परीक्षाची टांगती तलवार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहे.

पर्याय काय असू शकतो?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांचे लसीकरण करून परीक्षा घेता येतील. पण ऑफलाइनच परीक्षा घेणे योग्य राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनावर अन्याय होणार नाही आणि विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचे चीज होईल. बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करणे योग्य नाही. यासाठी शासनाने परीक्षा ऑफलाइन घेण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच विद्यार्थ्यांनी अजूनही वेळ न घालवता अभ्यास नियमितपणे करावा, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

बारावी परीक्षा ही मुलांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यातील परीक्षा आहे. यापुढे त्यांच्यातील एक सुजाण नागरिक घडणार असतो. त्यामुळे ही परीक्षा ऑफलाइन होणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी एक एक गुणासाठी अभ्यास करत असतात. चांगले मार्क मिळाले तर पुढील शिक्षणासाठी मार्ग सोपा होणार असतो.

सुभाष गारगोटे, प्राचार्य -

लॉकडॉऊन शिथिल झाले त्यावेळी तीन महिने विद्यार्थ्याकडून जास्तीत-जास्त अभ्यासक्रम घेतला आहे. उर्वरित ऑनलाइन अभ्यास करून घेतला आहे. हे सगळे करताना प्रत्येक शिक्षकाला तारेवरची कसरत करावी लागली आहे.ऑनलाइन शिक्षणाने उच्चशिक्षित पिढी घडू शकत नाही. बारावीची परीक्षा घेणे गरजेचे आहे, मग ती कशीही घ्यावी याचा विचार शासन स्तरावर घ्यावा.

पांडुरंग घेनंद, शिक्षक.

वर्षातील काही महिने ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. तसेच, अभ्यासक्रम पूर्ण करत अनेक विषयांची पुनरावृत्ती झाली आहे. बारावीच्या परीक्षाबाबत अजूनही निर्णय घेण्यात आला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लवकर निर्णय घेतल्यास डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे उतरले. - यश घाटे, विद्यार्थी