शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

बारावी परीक्षेवर पर्याय निघत नसल्याने पालक-विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

दर वर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा होऊन जातात. मात्र, यंदा कोरोनाचा कहर वाढल्याने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, ...

दर वर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा होऊन जातात. मात्र, यंदा कोरोनाचा कहर वाढल्याने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. सुरुवातीला मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात परीक्षा घेतल्या जातील असे घोषित करण्यात आले होते. परंतु मे संपला, तरी अजूनही शासन स्तरावर कोणताही निर्णय घेतला नाही. शिक्षणतज्ज्ञांच्या मते बारावीची परीक्षा ऑनलाइन घेणे कठीण असल्याने ऑफलाइनच घ्यावी, अशी मागणी होत आहे. परीक्षा केव्हा होतील आणि त्या कशा पद्धतीने घेतल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तोपर्यंत परीक्षाची टांगती तलवार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहे.

पर्याय काय असू शकतो?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांचे लसीकरण करून परीक्षा घेता येतील. पण ऑफलाइनच परीक्षा घेणे योग्य राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनावर अन्याय होणार नाही आणि विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचे चीज होईल. बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करणे योग्य नाही. यासाठी शासनाने परीक्षा ऑफलाइन घेण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच विद्यार्थ्यांनी अजूनही वेळ न घालवता अभ्यास नियमितपणे करावा, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

बारावी परीक्षा ही मुलांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यातील परीक्षा आहे. यापुढे त्यांच्यातील एक सुजाण नागरिक घडणार असतो. त्यामुळे ही परीक्षा ऑफलाइन होणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी एक एक गुणासाठी अभ्यास करत असतात. चांगले मार्क मिळाले तर पुढील शिक्षणासाठी मार्ग सोपा होणार असतो.

सुभाष गारगोटे, प्राचार्य -

लॉकडॉऊन शिथिल झाले त्यावेळी तीन महिने विद्यार्थ्याकडून जास्तीत-जास्त अभ्यासक्रम घेतला आहे. उर्वरित ऑनलाइन अभ्यास करून घेतला आहे. हे सगळे करताना प्रत्येक शिक्षकाला तारेवरची कसरत करावी लागली आहे.ऑनलाइन शिक्षणाने उच्चशिक्षित पिढी घडू शकत नाही. बारावीची परीक्षा घेणे गरजेचे आहे, मग ती कशीही घ्यावी याचा विचार शासन स्तरावर घ्यावा.

पांडुरंग घेनंद, शिक्षक.

वर्षातील काही महिने ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. तसेच, अभ्यासक्रम पूर्ण करत अनेक विषयांची पुनरावृत्ती झाली आहे. बारावीच्या परीक्षाबाबत अजूनही निर्णय घेण्यात आला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लवकर निर्णय घेतल्यास डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे उतरले. - यश घाटे, विद्यार्थी