शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पुणे जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये ‘थेट सरपंच’ निवडणुकीबाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 18:44 IST

राज्य शासनाने थेट लोकांमधून सरपंचपदाची निवडणूक केली रद्द

ठळक मुद्देउमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

पुणे : जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी, भिवरी आणि दौंड तालुक्यातील बिरोबावाडी या सहा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, शुक्रवार (दि. ६) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. परंतु राज्य शासनाने थेट लोकांमधून सरपंचपदाचीनिवडणूक रद्द केली असून, अद्याप राज्यातील सरपंचपदांचे आरक्षणदेखील जाहीर झालेले नाही. यामुळे या सहा ग्रामपंचायतींमध्ये थेट लोकांमधून की सदस्य मंडळांमधून सरपंच निवडणूक होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.     राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल २०२० ते जून २०२० या कालवधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या कालवधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण अद्याप निश्चित केलेले नाही. सरपंचपदासाठीचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नसल्यामुळे थेट सरपंच निवडीसाठी नामनिर्देशन कोणत्या प्रवर्गासाठी मागवावे हे स्पष्ट होत नाही. यामुळे सरपंचपदाचे निवडणुकीची नोटीस जाहीर करणे योग्य नाही. यामुळे शासनाने आराक्षण जाहीर केल्यानंतर नोटीस प्रसिद्धी व नामानिर्देशन स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करता येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.     पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी, भिवरी आणि दौंड तालुक्यातील बिरोबावाडी या सहा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी शुक्रवार (दि. ६) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. १३ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर १६ मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेर मुदत, त्यानंतर शिल्लक उमेदवारी अर्जांची छाननी करुन १८ मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी सहा ग्रामपंचायतींसाठी २९ मार्च रोजी मतदान होणार असून, ३० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यास सरपंच थेट लोकांमधून निवडणार की शासनाच्या नवीन अध्यादेशाची वाट पाहून नव्या पद्धतीनुसार सदस्यांमधून सरपंच निवडणार, याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश नाहीत. यामुळे या सहा ग्रामपंचायतींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेsarpanchसरपंचState Governmentराज्य सरकारgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक