शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाने विद्यार्थी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:02 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विविध विषयांच्या एमए, एमएस्सी, एमकॉम प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये विभागांकडून प्रवेशासाठी वेगवेगळे नियम लावले जात असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विविध विषयांच्या एमए, एमएस्सी, एमकॉम प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये विभागांकडून प्रवेशासाठी वेगवेगळे नियम लावले जात असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. समाजशास्त्र विभागाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून अचानक ती मागे घेतल्यानेही गोंधळ उडालेला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मोठी चुरस असते. काही विभागांकडून प्रवेश परीक्षा घेऊन त्यामधील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो, तर काही विभागांमध्ये बीए, बीकॉमला मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना त्यासाठी असलेल्या निकषांचे पालन काही विभागांकडून होत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली आहे.राज्यशास्त्र विभागामध्ये अपंग कोट्यातून प्रवेश देताना ४० टक्के अपंग व १०० टक्के अपंग असा भेदभाव केला आहे. वस्तुत: नियमानुसार अपंगांसाठी राखीव असलेल्या जागांवर प्रवेश देताना सर्व अपंगांना एकसमान धरून गुणवत्तेनुसार प्रवेश देणे आवश्यक होते. मात्र, या नियमाचे पालन न करता गुणवत्तायादी जाहीर करण्यात आल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने केली आहे. त्याबाबत त्याने प्र-कुलगुरू तसेच शैक्षणिक प्रवेश विभागाकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे. प्रवेशामध्ये असलेले सांस्कृतिक, क्रीडा आरक्षण यानुसार प्रवेश देतानाही अनेक विभागांचा गोंधळ उडत आहे. विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रियेच्या सर्व नियमांबाबत विभागांना अवगत करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.गुणवत्तायादी मागे घेतल्याने गोंधळसमाजशास्त्र विभागाने २० जुलै २०१८ रोजी एमए प्रथम वर्ष प्रवेशाची गुणवत्तायादी जाहीर केली होती, मात्र त्यानंतर २३ जुलै रोजी अचानक त्यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध करून ही गुणवत्ता यादी मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. तांत्रिक कारणांमुळे ही गुणवत्तायादी मागे घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण विभागप्रमुख संजय कोळेकर व प्राध्यापक अनुरेखा चारी-वाघ यांनी दिले आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे. गुणवत्तायादी प्रसिद्ध करतानाच ती काळजीपूर्वक तयार करणे आवश्यक होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना झालेला त्रास वाचला असता, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थी