शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध, ठेकेदारधार्जिणा निर्णय रद्द करा, महापौर, आयुक्तांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 03:49 IST

पुण्याचे आभूषण आणि रंगभूमीचा आधार असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने विरोध दर्शविला आहे. हे रंगमंदिर पाडू नये, याबाबतचे निवेदन मंगळवारी महापौर, महापालिका आयुक्तांना देण्यात आले.

पुणे - पुण्याचे आभूषण आणि रंगभूमीचा आधार असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने विरोध दर्शविला आहे. हे रंगमंदिर पाडू नये, याबाबतचे निवेदन मंगळवारी महापौर, महापालिका आयुक्तांना देण्यात आले.या वेळी बाबासाहेब पाटील (पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष, मेलडी मेकर्सचे अशोककुमार सराफ, अभिनेत्री माधवी मोरे, आरती शिंदे, काव्या शिंदे, ज्योती बोरावके, कल्याणी वाडेकर, अभिनेता योगेश सुपेकर, आशुतोष वाडेकर, विनोद धोकटेकर, संदीप पळीवाले, नितीन मोरे, दीपराज जाधव, एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष राहुल भालेराव, निर्माते माणिकशेठ बजाज, दिग्दर्शक चंद्र्रकांत दुधगावकर, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी, सिने-नाट्य क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडणे, हा पुणेकरांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी करणारा आणि ठेकेदारधार्जिणा निर्णय आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याच्या नव्हे, तर राज्याच्या रंगभूमी चळवळीचे स्मृतिमंदिर आहे.शहरात प्रत्येक भागात रंगमंदिरे उभी राहिलेली आहेत, आता बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यापेक्षा त्याचे जतन करणे गरजेचे आहे. या रंगमंदिराच्या वास्तुतून दिग्गज कलाकार तयार झाले आहेत. या वास्तूचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. ही वस्तू पडण्याचा घाट घातला जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे, असे निवेदनात म्हटले आहे. बालगंधर्व रंगमंदिरात होणारे प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम न थांबविता आणि त्यात खंड न पाडता त्या पद्धतीचे नियोजन करून बांधकाम करावे. बालगंधर्व रंगमंदिरातील मोकळी जागाआहे तिचा नवीन थिएटरउभारताना वापर करावा, असे मेलडी मेकर्सचे अशोककुमार सराफ यांनी सांगितले.पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्यासमवेत महापौर मुक्ता टिळक, आयुक्त कुणालकुमार, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी मुरलीधर मोहोळ, श्रीनाथ भिमाले यांना निवेदन सादर केले.जीएसटीमुळे कलाकारांचे जीवनमान अडचणीतपु. ल. देशपांडे यांनी स्वत: उभे राहून बालगंधर्व रंगमंदिराचे काम पाहिले होते. पुलंच्या कल्पनेतून साकारलेले हे रंगमंदिर पडल्यास तत्कालीन कलाकारांच्या भावनांचा अपमान होईल. जीएसटी करप्रणाली आपल्यापासून सामान्य कलाकारांचे जीवनमान अडचणीत आहे. वाटते हे रंगमंदिर पाडून नव्याने बांधणे यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी जाणार असून, अनेक नाटकांचे व्यावसायिक प्रयोग बंद होऊन कलाकारांवर मोठ्या प्रमाणावर उपासमारीची वेळ येऊ शकते. सद्य:स्थितीत असलेले बालगंधर्व रंगमंदिर उत्तम व सुस्थितीत असून, त्यामध्ये कामे करणे आवश्यक आहे, याकडे बाबासाहेब पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Puneपुणे