शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

केंद्र सरकारने कामगार कायदा रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा : कामगार संघटना कृती समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 1:08 PM

कामगार कायदा मोडीत काढण्याचा उद्योग रद्द करा..

ठळक मुद्देकामगारांची रोजगार सुरक्षा नष्ट होणार

पिंपरी : केंद्र सरकारने विरोधकांच्या अनुपस्थितीत कामगार कायदे रद्द करून उद्योगपतींना अनुकूल कायदे संमत केले आहेत. त्यामुळे कामगारांची रोजगार सुरक्षा नष्ट होणार असून, कायम कामगार संकल्पना मोडीत निघणार असल्याचा दावा कामगार संघटना कृती समितीने केला आहे. 

लोकसभेत २२ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षांच्या अनुपस्थितीत कामगार कायदे रद्द केले. त्यामुळे कोणत्याही कारणाशिवाय कामगारांना कामावरून कमी करण्याचा अधिकार उद्योगांना मिळणार आहे. पूर्व परवानगी शिवाय तीनशे कामगार संख्या असलेल्या उद्योगाला कामगार कपात करण्यास अथवा कंपनी बंद करण्याचा अधिकार मिळणार आहे. सरकारने कंत्राटी कामगार कायदा रद्द केल्याचे दिसत आहे. ठराविक कालावधीसाठी कामगार नेमणूक करण्याची प्रथा सार्वत्रिक करून कायम कामगार संकल्पना नष्ट केली जाईल.

कामगार कायदे केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्त विषय असतानाही केंद्र सरकारने राज्यांना विचारात न घेताच कायद्यात बदल केले आहेत. कामगार कायदा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करू नये, लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना दहा हजार रुपयांचे अनुदान द्यावे,  लॉकडाऊन काळातील वेतन पूर्ण वेतन न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सिटू पुणेचे अजित अभ्यंकर, श्रमिक एकता संघाचे दिलीप पवार, वसंत पवार यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. कामगार संघटना कृती समितीने मागण्यांचे निवेदन कामगार उपयुक्तांना नुकतेच दिले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEmployeeकर्मचारीLabourकामगारCentral Governmentकेंद्र सरकार