शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी अखेर तक्रार निवारण समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 19:42 IST

विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोठया अडचणींना सामोरे जावे लागत होते. यापार्श्वभूमीवर अखेर विद्यार्थी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : दाद मागण्याचा मार्ग खुलासेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अखेर निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. प्रवेश मिळण्यात येणाऱ्या अडचणी, परीक्षेबाबतच्या तक्रारी, रेंगाळणारे निकाल, वेळापत्रकांची अनियमितता, प्राध्यापकांकडून दिला जाणारा त्रास आदी विविध प्रश्नांबाबत विद्यार्थी या समितीकडे दाद मागू शकतील.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ७९ (३) अन्वये विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन वर्ष उलटले तरी या समितीची स्थापना करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोठया अडचणींना सामोरे जावे लागत होते. यापार्श्वभूमीवर अखेर विद्यार्थी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. आंतरविद्याशाखीय अभ्यास विभागाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, प्रा. देविदास वायदंडे, अध्यापकेतर कर्मचारी विवेक बुचडे, उपकुलसचिव बी. डी. उढाणे या समितीचे सदस्य असणार आहेत.विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाल्याने त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी याची मोठी मदत होऊ शकणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी