शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

"तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही..." उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सडेतोड प्रत्युत्तर

By नितीन चौधरी | Updated: November 25, 2023 16:57 IST

डेंग्यूचे कारण देऊन अजित पवार राजकीय आजारी आहेत अशी अफवा पसरवल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच हे स्पष्टीकरण दिले आहे...

पुणे : “आजारपणानंतर मी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलो होतो. मात्र, मी तक्रार करायला गेलो असे पसरविण्यात आले. तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही,” असे सडेतोड प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. डेंग्यूचे कारण देऊन अजित पवार राजकीय आजारी आहेत अशी अफवा पसरवल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच हे स्पष्टीकरण दिले आहे.

पुण्यातील विविध शासकीय इमारतींच्या कामाच्या आढाव्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाच्या आंदोलनावरून राज्य पेटलेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे डेंग्यूमुळे सुमारे पंधरा दिवस आजारी होते. मात्र, वृत्तवाहिन्या तसेच वर्तमानपत्रांमधून पवार यांचा हा आजार राजकीय असल्याचे चित्र पसरवण्यात आले. त्याचे वाईट वाटल्याचे सांगून मी लेचा पेचा माणूस नाही असे स्पष्टीकरण पवार यांनी यावेळी दिले. गेली ३२ वर्षे मी माझी मते स्पष्टपणे लोकांसमोर मांडत असून राजकीय आजार दर्शविण्याचा माझ्या स्वभावात व रक्तात नाही असे त्यांनी यावेळी ठासून सांगितले. आजारपणातून उठल्यानंतर पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यास नवी दिल्ली येथे गेले होते. त्यावेळी महायुतीतील शिवसेना तसेच भाजपची तक्रार करायला गेल्याचे चित्र रंगवण्यात आले त्यावरही नाराजी व्यक्त करत पवार यांनी तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही, असे सडेतोड उत्तर दिले. सर्वांना सोबत घेऊन काम करणे ही राज्याची संस्कृती व परंपरा असून ती चालवली पाहिजे असेही त्यांनी मत व्यक्त केले.

सरकार अस्थिर कसे?

यावरूनच राज्य सरकार अस्थिर असल्याचेही विरोधक आरोप करत असल्याबाबत विचारले असता, २०० आमदारांचा पाठिंबा असताना हे सरकार अस्थिर कसे असा सवालच त्यांनी विरोधकांना विचारला. विकासाला महत्त्व देऊन आपण पुढे जात असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. आमदार अपात्रतेच्या कारणावरून काही लोक सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांकडे अपिलात गेले आहेत. प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार असल्याचे सांगत ही वेगळी प्रक्रिया असून त्याचा सरकार स्थिर असल्याची काही संबंध नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याबाबत राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसून महायुती सरकार म्हणून राज्य सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत असल्याचे ते म्हणाले.प्रत्येकाने काळजी घ्यावी

आंतरवली सराटी येथे झालेल्या दगडफेकीबाबत एकाला अटक करण्यात आली आहे, याबाबत विचारले असता पवार म्हणाले, “राज्यात जाणीवपूर्वक कुणीही त्रास देत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. त्यात अधिकारी देखील असल्यास त्यांच्यावर कारवाई झाली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देत आहेत. मनोज जरांगे असो की राज्य सरकारमधील कोणीही असो कुणीही भडकाऊ भाषा वापरू नये. एखाद्या शब्दाने समाजात तेढ निर्माण होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.”

हिताचा निर्णय घेऊ

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी ४०० कोटींचा निधी मागितला असल्याचे वृत्त वाचले असून मुंबईला गेल्यावर याबाबत माहिती घेईल असे त्यांनी स्पष्ट केले. आयोगाला दिलेल्या अधिकारात तसेच स्वायत्ततेत ते काम करत असून आयोगाच्या मागण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करू व राज्याच्या हिताचा निर्णय घेऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेdengueडेंग्यूAmit Shahअमित शाह