शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानभरपाई द्या; बारामती टोलमुक्त करू

By admin | Updated: November 5, 2015 02:16 IST

बारामतीला संपूर्ण टोलमुक्त करण्यासाठी बारामती टोलवेज कंपनीने रस्ते विकास महामंडळाला जवळपास १६८ कोटी रुपये नुकसानभरपाई मागितली आहे. तरच सर्व टोल नाके बंद होतील

बारामती : बारामतीला संपूर्ण टोलमुक्त करण्यासाठी बारामती टोलवेज कंपनीने रस्ते विकास महामंडळाला जवळपास १६८ कोटी रुपये नुकसानभरपाई मागितली आहे. तरच सर्व टोल नाके बंद होतील. दुहेरी टोल आकारणीला विरोध झाला. त्यामुळे एकेरी टोल आकारणी सुरू झाली. त्यानंतर भाजपा सरकारने चारचाकी गाड्या, एसटी बस वगळून टोल आकारणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे उत्पन्नात घट झाल्याचा दावा टोलवेज कंपनीने केला आहे. २००५ पासून ते आज अखेर बारामती शहरातील ५ टोलनाक्यांवर टोल आकारणी केली जाते. सुरुवातीचे ५ वर्षे अन्य ठेकेदाराकडे कंत्राट होते. त्यानंतर २०१० पासून बारामती टोलवेज कंपनीकडे टोल आकारणीसह रस्तेदुरुस्ती, बांधणीचे काम आले. मुंबई इन्ट्री पॉइंट या कंपनीची बारामती टोलवेज ही उपकंपनी आहे. या कंपनीकडून ६५ कोटी रुपये रस्ते विकास महामंडळाने अनामत घेतली आहे. तर, कंपनीने पुढच्या टप्प्यात कऱ्हा नदीवरील ८ कोटींचा पूल, २० कोटींहून अधिक खर्चाचा रिंगरोड बांधला. कंपनीने ८५ कोटी रुपये गुंतवले आहेत. त्या मानाने उत्पन्न घटले असल्याचा दावा केला आहे. (प्रतिनिधी)एमएसआरडीसीने जागेचा ताबा द्या, बारामती संपूर्ण टोलमुक्त करू, असे पत्रच दिले आहे. तर टोल आकारणी बंद करून बारामतीतून गाशा गुंडाळण्यासाठी टोलवेज कंपनी देखील प्रयत्नात आहे. त्यामुळे त्यांनी एमएसआरडीसीकडे जवळपास १६८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. त्यावर एमएसआरडीसी विचार करीत आहे. या मागणीवर चर्चा करून, ११० ते ११५ कोटींपर्यंत नुकसानभरपाई देता येईल का, याची पडताळणी केली जात आहे. आता टोलमुक्त बारामती करण्यासाठी राजकारण आडवे येऊ नये, अशी अपेक्षा बारामतीकरांची आहे. २००३ मध्ये ३८ कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला. त्याच्या वसुलीसाठी ५ टोलनाके उभारण्यात आले. त्यानंतर २०१० ला बारामती टोलवेजकडे टोलआकारणीचा ठेका दिला. १९ वर्षे ४ महिने या कालावधीसाठी हा ठेका आहे. नगरपालिकेने कचरा डेपोची जागा परत मागितली आहे. परंतु, शासनाचा निर्णय असल्यामुळे त्यात अनेक अडथळे आहेत. कागदोपत्रीच जागा एमएसआरडीसीकडे : डेपोच्या जागेवर कर्जएमएसआरडीसीला जळोचीतील जागा ९९ वर्षांच्या कराराने दिली आहे. परंतु, ताबा नगरपालिकेकडेच आहे. ती जागा पूर्णपणे रिकामी करून द्यावी, अशी मागणी एमएसआरडीसीने पालिकेकडे २०१४ मध्येच केली आहे. जागेचा ताबा निर्धोकपणे मिळाल्यास बारामती संपूर्ण टोलमुक्त होईल, असे कळविले होते. परंतु, सरकार बदलल्यानंतर बारामतीकरांना पूर्णपणे टोलमुक्तीसाठी राजकीय अडथळे आले. एमएसआरडीसीच्या ताब्यातील जागेवर ५९ कोटी ४१ लाख रुपये कर्ज टोलवेज कंपनीने मुंबईतील बँकेकडून घेतले आहे. त्यातील ५२ कोटी रुपये कर्जाची फेड आतापर्यंत झाली आहे.