शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानभरपाई द्या; बारामती टोलमुक्त करू

By admin | Updated: November 5, 2015 02:16 IST

बारामतीला संपूर्ण टोलमुक्त करण्यासाठी बारामती टोलवेज कंपनीने रस्ते विकास महामंडळाला जवळपास १६८ कोटी रुपये नुकसानभरपाई मागितली आहे. तरच सर्व टोल नाके बंद होतील

बारामती : बारामतीला संपूर्ण टोलमुक्त करण्यासाठी बारामती टोलवेज कंपनीने रस्ते विकास महामंडळाला जवळपास १६८ कोटी रुपये नुकसानभरपाई मागितली आहे. तरच सर्व टोल नाके बंद होतील. दुहेरी टोल आकारणीला विरोध झाला. त्यामुळे एकेरी टोल आकारणी सुरू झाली. त्यानंतर भाजपा सरकारने चारचाकी गाड्या, एसटी बस वगळून टोल आकारणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे उत्पन्नात घट झाल्याचा दावा टोलवेज कंपनीने केला आहे. २००५ पासून ते आज अखेर बारामती शहरातील ५ टोलनाक्यांवर टोल आकारणी केली जाते. सुरुवातीचे ५ वर्षे अन्य ठेकेदाराकडे कंत्राट होते. त्यानंतर २०१० पासून बारामती टोलवेज कंपनीकडे टोल आकारणीसह रस्तेदुरुस्ती, बांधणीचे काम आले. मुंबई इन्ट्री पॉइंट या कंपनीची बारामती टोलवेज ही उपकंपनी आहे. या कंपनीकडून ६५ कोटी रुपये रस्ते विकास महामंडळाने अनामत घेतली आहे. तर, कंपनीने पुढच्या टप्प्यात कऱ्हा नदीवरील ८ कोटींचा पूल, २० कोटींहून अधिक खर्चाचा रिंगरोड बांधला. कंपनीने ८५ कोटी रुपये गुंतवले आहेत. त्या मानाने उत्पन्न घटले असल्याचा दावा केला आहे. (प्रतिनिधी)एमएसआरडीसीने जागेचा ताबा द्या, बारामती संपूर्ण टोलमुक्त करू, असे पत्रच दिले आहे. तर टोल आकारणी बंद करून बारामतीतून गाशा गुंडाळण्यासाठी टोलवेज कंपनी देखील प्रयत्नात आहे. त्यामुळे त्यांनी एमएसआरडीसीकडे जवळपास १६८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. त्यावर एमएसआरडीसी विचार करीत आहे. या मागणीवर चर्चा करून, ११० ते ११५ कोटींपर्यंत नुकसानभरपाई देता येईल का, याची पडताळणी केली जात आहे. आता टोलमुक्त बारामती करण्यासाठी राजकारण आडवे येऊ नये, अशी अपेक्षा बारामतीकरांची आहे. २००३ मध्ये ३८ कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला. त्याच्या वसुलीसाठी ५ टोलनाके उभारण्यात आले. त्यानंतर २०१० ला बारामती टोलवेजकडे टोलआकारणीचा ठेका दिला. १९ वर्षे ४ महिने या कालावधीसाठी हा ठेका आहे. नगरपालिकेने कचरा डेपोची जागा परत मागितली आहे. परंतु, शासनाचा निर्णय असल्यामुळे त्यात अनेक अडथळे आहेत. कागदोपत्रीच जागा एमएसआरडीसीकडे : डेपोच्या जागेवर कर्जएमएसआरडीसीला जळोचीतील जागा ९९ वर्षांच्या कराराने दिली आहे. परंतु, ताबा नगरपालिकेकडेच आहे. ती जागा पूर्णपणे रिकामी करून द्यावी, अशी मागणी एमएसआरडीसीने पालिकेकडे २०१४ मध्येच केली आहे. जागेचा ताबा निर्धोकपणे मिळाल्यास बारामती संपूर्ण टोलमुक्त होईल, असे कळविले होते. परंतु, सरकार बदलल्यानंतर बारामतीकरांना पूर्णपणे टोलमुक्तीसाठी राजकीय अडथळे आले. एमएसआरडीसीच्या ताब्यातील जागेवर ५९ कोटी ४१ लाख रुपये कर्ज टोलवेज कंपनीने मुंबईतील बँकेकडून घेतले आहे. त्यातील ५२ कोटी रुपये कर्जाची फेड आतापर्यंत झाली आहे.