शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

मोदी सरकारच्या काळात ‘लायसन्सिंग राज’ला आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “लसींसाठी परवानग्या मिळवताना पूर्वी खूप त्रास व्हायचा आणि वेळही लागायचा. मोदी सरकारच्या काळात ‘लायसन्स ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “लसींसाठी परवानग्या मिळवताना पूर्वी खूप त्रास व्हायचा आणि वेळही लागायचा. मोदी सरकारच्या काळात ‘लायसन्स राज’ला आळा बसला आहे. कोविशिल्ड लसीला तातडीने परवानगी मिळाल्याने उत्पादन वेगाने करणे शक्य झाले. लसीला मंजुरी मिळाली नसती, तर खूप नुकसान झाले असते,” असे प्रतिपादन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी केले. आर्थिक हित न पाहता कोविडवरची जगातली सर्वात कमी किमतीची लस उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने शुक्रवारी (दि. १३) गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, टिळक स्मारक मंदिरचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणिती टिळक यावेळी उपस्थित होते.

डॉ. पूनावाला म्हणाले, “लोकमान्य टिळक हे द्रष्टे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार घेताना खूप आनंद होत आहे. सन १८८९ मध्ये लोकमान्य टिळक यांनी लस उत्पादनाचे मोठे केंद्र पुण्यात व्हावे ,अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे स्वप्न ‘सिरम’च्या रूपात साकार झाले याचा मला अभिमान वाटतो. सन १९६६ मध्ये सुरू झालेली छोटी कंपनी ते जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणारी कंपनी हा प्रवास अभिमानाचा आहे. मी हा पुरस्कार माझ्या पत्नीला समर्पित करतो.”

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘मेरे बहाद्दर’ असे म्हणत लोकमान्य टिळकांनी सायरस पूनावाला यांना मिठी मारली असती. “ज्ञानाची जिज्ञासा, अपार मेहनत यांचे फळ म्हणजे पूनावाला यांचे आजचे यश आहे. टिळकांनी शिक्षणसंस्था उभ्या केल्या. स्वातंत्र्यानंतर भारतीयांना वाचता-लिहिता यावे, विचार करता यावा, असे टिळकांना वाटायचे. तरुणांना आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी करता यायला हवा. पुणे हे संशोधनाचे माहेरघर, हे पूनावाला यांनी दाखवून दिले.”