शहरं
Join us  
Trending Stories
1
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
5
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
6
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
7
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
8
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
9
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
10
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
11
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
12
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
13
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
14
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
15
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
16
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
17
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
18
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
19
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
20
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना

चीनमधून आलाय ?'; आधी 'कोरोना' नसल्याचे प्रमाणपत्र द्या, मगचं कामावर या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 09:25 IST

चीनमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भारतातून शिक्षण, नोकरी, व्यवसाय अन्य कारणांसाठी चीनमध्ये गेलेले बहुतेक जण भारतात परतू लागले आहे. मागील महिनाभरात अनेक भारतीयांनी चीन सोडले आहे.

पुणे : चीनमधून परतलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना काही खासगी कंपन्यांकडून कोरोना विषाणुची लागण झाली नसल्याचे प्रमाणपत्र मागितले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या तक्रारी काही कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाकडे केल्या आहेत. तसेच काही कंपन्यांकडून संबंधित कर्मचाऱ्यांयांबाबत नेमकी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात विचारणाही केली जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे.चीनमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भारतातून शिक्षण, नोकरी, व्यवसाय अन्य कारणांसाठी चीनमध्ये गेलेले बहुतेक जण भारतात परतू लागले आहे. मागील महिनाभरात अनेक भारतीयांनी चीन सोडले आहे. कंपनीच्या कामानिमित्त चीनमध्ये काही कर्मचारी चीनमध्ये जाऊन आले आहेत. आधीच कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या या कर्मचाऱ्यांना आता कंपन्यांकडून कार्यालयात येण्यास मनाई केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत एका कर्मचाºयाने आरोग्य विभागाकडे यासंदर्भात तक्रारही केली आहे. त्यांच्या कंपनीने कोरोना विषाणुची लागण झाली नसल्याचे प्रमाणपत्र रुग्णालयाकडून आणण्यास सांगितले आहे. त्या कर्मचाºयाला कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही कंपनीकडून हे प्रमाणपत्र मागितले आहे. कंपन्यांकडून दक्षता म्हणून हे पाऊल उचलले जात आहे.याविषयी माहिती देताना आरोग्य विभागातील राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, चीनमधून आलेल्या कर्मचाऱ्यांना हा अनुभव येत आहे. काही जणांनी याबाबत आरोग्य विभागाकडे विचारणाही केली आहे. कंपन्यांकडूनही या कर्मचाऱ्यांसंदर्भात  कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती घेतली जात आहे. चीनमधून परतलेल्या कर्मचाºयांना कोणतीही लक्षणे नसल्यास भितीचे कारण नाही. मात्र, संबंधितांनी किमान चौदा दिवस घरीच राहून काळजी घेणे आवश्यक आहे. पण एवढ्या दिवस कंपनीकडून सुट्टी घेतल्यास नोकरीवर परिणाम होऊ शकतो, या भितीने संबंधित कर्मचारी कंपनीत रुजू होण्यासाठी जात आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र दिले जात नाही.  चौदा दिवसांची पगारी रजा द्यावीचीनमधून परतलेल्यांना किमान चौदा दिवस घरातच राहून काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी असतील तर त्यांना चीनमधून परतल्यापासून किमान चौदा दिवसांची पगारी रजा देण्यात यावी. त्यांच्याकडून कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र मागण्यात येऊ नये. गोपनीयतेच्या कारणास्तव असे प्रमाणपत्र दिले जात आहे.- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग

टॅग्स :corona virusकोरोनाITमाहिती तंत्रज्ञानhinjawadiहिंजवडी