शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधून आलाय ?'; आधी 'कोरोना' नसल्याचे प्रमाणपत्र द्या, मगचं कामावर या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 09:25 IST

चीनमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भारतातून शिक्षण, नोकरी, व्यवसाय अन्य कारणांसाठी चीनमध्ये गेलेले बहुतेक जण भारतात परतू लागले आहे. मागील महिनाभरात अनेक भारतीयांनी चीन सोडले आहे.

पुणे : चीनमधून परतलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना काही खासगी कंपन्यांकडून कोरोना विषाणुची लागण झाली नसल्याचे प्रमाणपत्र मागितले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या तक्रारी काही कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाकडे केल्या आहेत. तसेच काही कंपन्यांकडून संबंधित कर्मचाऱ्यांयांबाबत नेमकी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात विचारणाही केली जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे.चीनमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भारतातून शिक्षण, नोकरी, व्यवसाय अन्य कारणांसाठी चीनमध्ये गेलेले बहुतेक जण भारतात परतू लागले आहे. मागील महिनाभरात अनेक भारतीयांनी चीन सोडले आहे. कंपनीच्या कामानिमित्त चीनमध्ये काही कर्मचारी चीनमध्ये जाऊन आले आहेत. आधीच कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या या कर्मचाऱ्यांना आता कंपन्यांकडून कार्यालयात येण्यास मनाई केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत एका कर्मचाºयाने आरोग्य विभागाकडे यासंदर्भात तक्रारही केली आहे. त्यांच्या कंपनीने कोरोना विषाणुची लागण झाली नसल्याचे प्रमाणपत्र रुग्णालयाकडून आणण्यास सांगितले आहे. त्या कर्मचाºयाला कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही कंपनीकडून हे प्रमाणपत्र मागितले आहे. कंपन्यांकडून दक्षता म्हणून हे पाऊल उचलले जात आहे.याविषयी माहिती देताना आरोग्य विभागातील राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, चीनमधून आलेल्या कर्मचाऱ्यांना हा अनुभव येत आहे. काही जणांनी याबाबत आरोग्य विभागाकडे विचारणाही केली आहे. कंपन्यांकडूनही या कर्मचाऱ्यांसंदर्भात  कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती घेतली जात आहे. चीनमधून परतलेल्या कर्मचाºयांना कोणतीही लक्षणे नसल्यास भितीचे कारण नाही. मात्र, संबंधितांनी किमान चौदा दिवस घरीच राहून काळजी घेणे आवश्यक आहे. पण एवढ्या दिवस कंपनीकडून सुट्टी घेतल्यास नोकरीवर परिणाम होऊ शकतो, या भितीने संबंधित कर्मचारी कंपनीत रुजू होण्यासाठी जात आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र दिले जात नाही.  चौदा दिवसांची पगारी रजा द्यावीचीनमधून परतलेल्यांना किमान चौदा दिवस घरातच राहून काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी असतील तर त्यांना चीनमधून परतल्यापासून किमान चौदा दिवसांची पगारी रजा देण्यात यावी. त्यांच्याकडून कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र मागण्यात येऊ नये. गोपनीयतेच्या कारणास्तव असे प्रमाणपत्र दिले जात आहे.- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग

टॅग्स :corona virusकोरोनाITमाहिती तंत्रज्ञानhinjawadiहिंजवडी