शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Maharashtra: उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या किमान तापमानात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 17:22 IST

राज्यातील अनेक ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे...

पुणे : उत्तर भारत, मध्य प्रदेशात थंडीची लाट आली असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रात गुरुवारपासून जाणवण्यास सुरुवात झाली असून, राज्यातील अनेक ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे. त्याचबरोबर जोरदार थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका आणखीनच जाणवत आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान मालेगाव येथे ११.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या भागातील तापमानात घट झाली आहे. या भागात पुढील ३ दिवस थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचा परिणाम राज्यात जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या किमान तापमानात घट झाली असली तरी मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, तर उर्वरित ठिकाणी किमान तापमान हे सरासरी तापमानाच्या जवळपास आहे. असे असले तरी जोरदार थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १२.९, लोहगाव १४.८, जळगाव १२.२, कोल्हापूर १७.५, महाबळेश्वर १२.२, मालेगाव ११.४, नाशिक १२.५, सांगली १६.३, सातारा १६, सोलापूर १५.७, मुंबई १९.८, सांताक्रूझ १९.५, अलिबाग १७.७, पणजी २१, रत्नागिरी १८.७, डहाणू १६.८, औरंगाबाद १२.६, परभणी १५.५, नांदेड १७.२, अकोला १४.९, अमरावती १३.१, बुलडाणा १२, ब्रह्मपुरी १५.६, चंद्रपूर १४.४, गोंदिया १३.८, नागपूर १४.६, वर्धा १३.२.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र