शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

CM Eknath Shinde On Shiv Sena Bhavan: “विधिमंडळातील कार्यालयानंतर शिवसेना भवन ताब्यात घेणार का?”; CM शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 00:26 IST

CM Eknath Shinde On Shiv Sena Bhavan: शिंदे गट शिवसेना भवनावर दावा सांगणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सूचक शब्दांत थेट भूमिका मांडली.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. यानंतर यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. यातच शिंदे गटाने विधिमंडळातील कार्यालय ताब्यात घेतले असून, शिवसेना भवनही ताब्यात घेणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. 

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपसह शिंदे गटातील अनेक नेते दोन्ही मतदारसंघात जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील कसबा पेठ मतदारसंघात प्रचारासाठी पोहोचले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवनासंदर्भात सूचक विधान केले. 

एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, केले महत्त्वाचे विधान

पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी बोलताना अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केले. निवडणूक आयोगाचा निर्णय मेरीटवर झाला आहे. त्यावर आक्षेप घेणे चूक आहे. आम्ही शिवसेना आहोत.  त्यामुळेच आम्ही विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले.  मात्र आम्हाला कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्हाला दावा करायचा नाही. आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही. आम्हाला बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे त्यामुळे आम्हाला काहीही नको, तुम्हाला कोणीही काहीही सांगितल तरी विश्वास ठेवू नका. अधिकृतपणे सांगतो कोणत्याही संपत्तीवर आमचा दावा नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, कसबा पेठेतील अनेक समाजाचे लोक मला येऊन भेटले. कसब्यातील जुन्या वाड्यांचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. नाराजी असल्याचे विरोधकांकडून हे पसरवले जात असून हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला आहे. मतदार ठरवत असतात की, कोणाला जिंकवायचे. युती सरकार ज्या धडाडीने निर्णय घेतय त्यामुळे हे सरकार काम करत असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे