शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:44 IST

मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी जगदाळे, गणबोटे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने वारसांना शासकीय नोकरी देण्याची नातेवाईकांची मागणी यावेळी नातेवाईकांकडून करण्यात आली.

CM Devendra Fadnavis: पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा दहशवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबीयांवर मोठे संकट आले आहे. त्यामुळे या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देता येईल का त्याबाबत प्रयत्न करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गणबोटे यांच्या कोंढवा येथील निवासस्थानी तर जगदाळे यांच्या कर्वेनगर येथील निवासस्थानी आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी जगदाळे यांची पत्नी प्रगती, मुलगी आसावरी व मातोश्री माणिकबाई जगदाळे तसेच त्यांचे इतर कुटुंबीयांचे फडणवीस यांनी सांत्वन केले व तेथे घडलेला संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. यावेळी मंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, शहर अध्यक्ष धीरज घाटे, संदीप खर्डेकर, राजेश बराटे, गिरीश खत्री, विशाल रामदासी, मंजुश्री खर्डेकर उपस्थित होते.

यावेळी जगदाळे कुटुंबीयांनी पर्यटन स्थळांवरील सुरक्षा अधिक मजबूत करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली. काश्मीरमध्ये घडलेल्या त्या घटनेचा संपूर्ण वृत्तांत त्यांनी फडणवीस यांना सांगितला. तसेच मुलगी आसावरी हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी त्यांनी केली.

जर सुरक्षा व्यवस्था असती तर लोकांचा जीव गेला नसता : गणबोटेआम्ही जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी जर सुरक्षा व्यवस्था असती तर लोकांचा जीव गेला नसता, असे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांसमोर गणबोटे कुटुंबीयांनी मांडले. गणबोटे म्हणाले की, आम्ही व इतर पर्यटक हॉटेलच्या बाहेर बसले होतो. गोळीबारचा आवाज झाल्याने आरडाओरडा सुरू झाला. पर्यटक धावपळ करू लागले, त्यामुळे दहशतवाद्यांनी लांबूनच पर्यटकांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात कौस्तुभ गणबोटेदेखील होते. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्री फडणीस यांनी दुपारी चारच्या सुमारास गणबोटे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, हर्षवर्धन पाटील यावेळी उपस्थित होते.

सुरक्षा, आपत्कालिन व्यवस्थेवर सवालहजारो पर्यटक काश्मिरमध्ये येतात आणि येथे दहशतवाद्यांचे कायमच हल्ले होत असतात हे माहिती असूनही सरकारने सुरक्षा ठेवली नाही, शिवाय तातडीने उपचारही मिळाले नाहीत यावर नातेवाईकांनी सवाल केला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस