शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

उंडवडी परिसरात ढगफुटी, १५ घरांमध्ये शिरले पाणी, शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:59 IST

पावसामुळे परिसरात अनेक शेती क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देचारा, संसारउपयोगी वस्तूंचे नुकसानकाही ठिकाणचे पुल वाहून गेल्याने होते रस्ते बंद होते

उंडवडी कडेपठार : बारामती तालुक्यातील जिरायती भाग समजणारा उंडवडी सुपे या भागात रविवारी ( दि.६) सायंकाळी ८ वाजता ढगफुटी झाल्याने येथील दुकानात तसेच घरात पाणी शिरले. रस्त्यालाही ओढ्याचे स्वरुप आले होते.सर्व रस्ते जलमय झाले आहेत.ओढ्याच्या बाजूला असणाऱ्या १५ घरामध्ये पाणी जाऊन चाऱ्यासह, धान्ये, कपडे,घराच्या परिसरात असणारी भांडी वाहून गेली आहेत.जिरायत भाग हा कायम दुष्काळाचा सामना करणारा भाग आहे.

दरवर्षी डिसेंबर महिना संपला की पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरवर अवलंबून असतो. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण होत आहेत.जरी पाऊस भरपुर असला तरी शेतात उत्पन्न शून्यच आहे कारण,पिके हातातोंडाशी आली की वादळी वारे आणि सतत पडत असलेल्या पावसामुळे सर्व पिकांचे पूर्णपणे नुकसान होत असल्याने कसलेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातून सावरते ना सावरते तोच रविवारी दिवस घातकच ठरला. इतरवेळी पाणी पाणी करणारे शेतकरी परंतु या ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे हैराण झाले आहे. २-३ तास पाऊस झाला तरी थांबायचे नावच घेईना,घरात पाणी दुकानात पाणी त्यात लाईट नाही जीव मुठीत धरुन येथील नागरिक पाऊस थांबायची वाट पाहत आहे.परंतु, रात्रभर पाऊस पडल्याने येथील ग्रामस्थांना व शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उंडवडी सुपे येथील ग्रामस्थांच्या घरामध्ये व दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील मालाबरोबर घरातील धान्ये तसेच इतर वस्तू पाण्यात वाहून गेल्या आहे. घरांच्या सर्वबाजूने पाणी वाहत जात असल्याने याठिकाणी ओढ्याचे स्वरूप तयार झाले होते.त्याचबरोबर उंडवडी कडेपठार, जराडवाडी या गावातील ओढ्याल्या नदीचे स्वरूप आले. तर जनावरांच्या गोठ्यातुन भुसा आणि संतोष जराड यांच्या ८५ कोंबड्या वाहून गेल्या आहेत. 

पावसामुळे परिसरात अनेक शेती क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पावसाचा जोर इतका प्रचंड होता की,शेतांचे बांध देखील फुटून गेले आहेत. बाजरी, मका, कडबा, ऊस त्याबरोबर अशी इतर काही ठिकाणची पीके भुईसपाट झाली आहेत तर काही ठिकाणची पिके अक्षरश: वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन-अडीच फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होऊन २-३ किलोमीटर अंतरावर रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणचे पुल वाहून गेल्याने रस्ते बंद होते..

लोकांच्या घरात व गुरांच्या गोठ्यात पुराचे पाणी शिरले. तसेच शेतकऱ्यांची बाजरीची ऊसाची पिके जमीनदोस्त झाली.शेतजमिनीतील माती वाहून गेली. गावातील काही वस्त्यांवर जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच काही पाणी साठवण बांध तलाव यांना धोका निर्माण झाला आहे.गावातील प्रत्येक भागात अशीच परिस्थिती असून प्रशासनाने याची दखल घेऊन पाहणी करून नुकसानभरपाई देण्यात यावी.कल्पना साळुंके सरपंच, जराडवाडी

टॅग्स :BaramatiबारामतीRainपाऊस