शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

उंडवडी परिसरात ढगफुटी, १५ घरांमध्ये शिरले पाणी, शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:59 IST

पावसामुळे परिसरात अनेक शेती क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देचारा, संसारउपयोगी वस्तूंचे नुकसानकाही ठिकाणचे पुल वाहून गेल्याने होते रस्ते बंद होते

उंडवडी कडेपठार : बारामती तालुक्यातील जिरायती भाग समजणारा उंडवडी सुपे या भागात रविवारी ( दि.६) सायंकाळी ८ वाजता ढगफुटी झाल्याने येथील दुकानात तसेच घरात पाणी शिरले. रस्त्यालाही ओढ्याचे स्वरुप आले होते.सर्व रस्ते जलमय झाले आहेत.ओढ्याच्या बाजूला असणाऱ्या १५ घरामध्ये पाणी जाऊन चाऱ्यासह, धान्ये, कपडे,घराच्या परिसरात असणारी भांडी वाहून गेली आहेत.जिरायत भाग हा कायम दुष्काळाचा सामना करणारा भाग आहे.

दरवर्षी डिसेंबर महिना संपला की पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरवर अवलंबून असतो. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण होत आहेत.जरी पाऊस भरपुर असला तरी शेतात उत्पन्न शून्यच आहे कारण,पिके हातातोंडाशी आली की वादळी वारे आणि सतत पडत असलेल्या पावसामुळे सर्व पिकांचे पूर्णपणे नुकसान होत असल्याने कसलेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातून सावरते ना सावरते तोच रविवारी दिवस घातकच ठरला. इतरवेळी पाणी पाणी करणारे शेतकरी परंतु या ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे हैराण झाले आहे. २-३ तास पाऊस झाला तरी थांबायचे नावच घेईना,घरात पाणी दुकानात पाणी त्यात लाईट नाही जीव मुठीत धरुन येथील नागरिक पाऊस थांबायची वाट पाहत आहे.परंतु, रात्रभर पाऊस पडल्याने येथील ग्रामस्थांना व शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उंडवडी सुपे येथील ग्रामस्थांच्या घरामध्ये व दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील मालाबरोबर घरातील धान्ये तसेच इतर वस्तू पाण्यात वाहून गेल्या आहे. घरांच्या सर्वबाजूने पाणी वाहत जात असल्याने याठिकाणी ओढ्याचे स्वरूप तयार झाले होते.त्याचबरोबर उंडवडी कडेपठार, जराडवाडी या गावातील ओढ्याल्या नदीचे स्वरूप आले. तर जनावरांच्या गोठ्यातुन भुसा आणि संतोष जराड यांच्या ८५ कोंबड्या वाहून गेल्या आहेत. 

पावसामुळे परिसरात अनेक शेती क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पावसाचा जोर इतका प्रचंड होता की,शेतांचे बांध देखील फुटून गेले आहेत. बाजरी, मका, कडबा, ऊस त्याबरोबर अशी इतर काही ठिकाणची पीके भुईसपाट झाली आहेत तर काही ठिकाणची पिके अक्षरश: वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन-अडीच फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होऊन २-३ किलोमीटर अंतरावर रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणचे पुल वाहून गेल्याने रस्ते बंद होते..

लोकांच्या घरात व गुरांच्या गोठ्यात पुराचे पाणी शिरले. तसेच शेतकऱ्यांची बाजरीची ऊसाची पिके जमीनदोस्त झाली.शेतजमिनीतील माती वाहून गेली. गावातील काही वस्त्यांवर जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच काही पाणी साठवण बांध तलाव यांना धोका निर्माण झाला आहे.गावातील प्रत्येक भागात अशीच परिस्थिती असून प्रशासनाने याची दखल घेऊन पाहणी करून नुकसानभरपाई देण्यात यावी.कल्पना साळुंके सरपंच, जराडवाडी

टॅग्स :BaramatiबारामतीRainपाऊस