शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

स्वच्छ सर्वेक्षणाचे बिगूल; पण कालवा अस्वच्छ, कालव्याचे झाले डंपिंग ग्राऊंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 1:59 AM

वानवडी परिसरातून लष्कर, एम्प्रेस गार्डन, जांभुळकर मळा, बी. टी. कवडे रोड पास करून पुढे वैदूवाडी, हडपसर, फुरसुंगीतून कालवा पुढील गावातून वाहत असतो.

वानवडी : वानवडी परिसरातून लष्कर, एम्प्रेस गार्डन, जांभुळकर मळा, बी. टी. कवडे रोड पास करून पुढे वैदूवाडी, हडपसर, फुरसुंगीतून कालवा पुढील गावातून वाहत असतो. परंतु, या कालव्याची दुरवस्था झाली असून कचराच कचरा दिसत असल्याने कालव्याचे डंपिंग ग्राऊंड झाल्याचे चित्र आहे.पुणे शहराच्या पूर्व भागात पाणी मिळण्यासाठी खडकवासला धरणातून ज्या कालव्याद्वारे पाणी सोडले जाते, त्यात कचऱ्याचे प्रमाण खूप वाढले असल्याने जमिनीसारखा भाग तयार होऊन त्यावर कुत्री, जनावरे बसत असल्याने अशा पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो तसेच कठड्यांची, भिंतीची दुरवस्था होऊन कालव्याच्या पात्रात ढासळल्याने पात्र कमी होऊन पाण्यातच दगडमातीचे ढीग साचले आहेत.पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षणाचे बिगूल वाजत असताना जीवनावश्यक गोष्टीपैंकी महत्त्वाच्या समजल्या जाणाºया ‘पाणी’ वाहणाºया कालव्याच्या स्वच्छतेकडे पुणे महापालिका व पाटबंधारे खात्याचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. या कालव्याची कधीही स्वच्छता होत नाही.तळाला असलेल्या घाणीमुळे जीवजंतू, प्राणी व मृतदेह यात अडकून सडतात व तेच पाणी पुढे शेतीसाठी आणि पिण्यासाठी वापरले जाते.पुणे शहरातील नदीसुधारणेसाठी केंद्राकडून ९०० कोटी रुपयांची तरतूद झालेली असताना कालव्याच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेने लक्ष देऊन पाटबंधारे खात्याशी सल्लामसलत करून निधी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि कालवा स्वच्छ करून ढासळलेल्या, तुटलेल्या भिंतीची बांधणी करावी जेणेकरून स्वच्छ व कचरामुक्त पाणी मिळून कालवाफुटीसारखे प्रकार होणार नाहीत.काही दिवसांपूर्वीच खडकवासला धरणातून कालव्यात पाणी सोडणे बंद केल्याने कालव्यातील घाणीची, कचºयाची परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.मागेसुद्धा जनता वसाहतीत कालवा फुटल्यानंतर कालव्याची सत्य स्थिती समोर आली होती. परंतु, त्यानंतरही कालव्याच्या स्वच्छतेकडे व दुरुस्तीकडे महापालिका, पाटबंधारे खात्याने फारसे लक्ष दिले गेले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता तरी पाण्यातील जीव तसेच कालव्यातील पाणी वापरत असलेल्या नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता कालवा दुरुस्त करून कचराविरहित करण्याकडे महापालिका व पाटबंधारे खात्याने लक्ष दिले पाहिजे.संरक्षक कठड्यांची पूर्तता नाहीच...रेसकोर्स रस्ता ते बी. टी. कवडे रस्ता यांना जोडणाºया कालव्याच्या शेजारील रस्त्याचा काही भाग ढासळला होता. त्यानंतर तिथे भर टाकून तो दुरुस्त करण्यात आला. परंतु, त्याच वेळी कालव्याच्या बाजूने संरक्षक जाळ्या किंवा कठडे लावण्याची मागणी झाली होती.अद्यापही या ठिकाणी संरक्षक जाळ्या किंवा कठड्याची पूर्तता झालेली नसल्याने कालव्याचे असणारे पात्र रस्त्याच्या समांतर असल्याने वाहने कालव्यात जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे संरक्षक जाळ्या किंवा कठडे लवकरात लवकर लावावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.अधिकारी फोन उचलेनात...कालव्याचा संबंध ज्या खात्याशी येतो अशा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना कालव्याच्या स्वच्छतेविषयीची माहिती घेण्यासाठी वारंवार फोन केला; परंतु फोन उचलत नसल्याने यासंबंधीची माहिती मिळाली नाही.कालव्याच्या देखभालीचा निर्णय पाटबंधारे खात्याचा असल्याने त्यांची जर परवानगी व सहकार्य करण्याचे पत्र महापालिकेला मिळाले, तर आमच्या वतीने कालवा स्वच्छ करून संरक्षक जाळ्या किंवा कठडे बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.- कालिंदा पुंडे,नगरसेविका, वानवडी

टॅग्स :Puneपुणे