शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

शहरात कचऱ्याचे ‘ढीग’

By admin | Updated: February 20, 2015 00:19 IST

शहरात निर्माण होणारा ओला कचरा ७० टक्के वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे महापालिका प्रशासनास शक्य झाले असले, तरी सुका कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे एकही जागा नाही,

पुणे : शहरात निर्माण होणारा ओला कचरा ७० टक्के वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे महापालिका प्रशासनास शक्य झाले असले, तरी सुका कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे एकही जागा नाही, तर पालिकेच्या कचरा रॅम्प आणि इतर जागाही गेल्या दीड महिन्यापासून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे संपल्या असून, गेल्या तीन दिवसांपासून हा कचरा उचलणे पालिका प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहे. परिणामी शहरात तब्बल दोन ते तीन टन कचरा पडून असून, त्यात प्रामुख्याने कागद आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा समावेश आहे.ग्रामस्थांनी ‘कचरा आंदोलन’ मागे घेऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला, तरी अद्याप महापालिकेने उरुळी येथील कचरा डेपोवर एकही गाडी पाठविलेली नाही. हे आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर, महिनाभरात उरुळी देवाची अथवा इतर ठिकाणी कचरा टाकण्यासाठी राज्यशासनाकडून जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप एक फूटही जागा मिळाली नसल्याने, शहरातील सुक्या कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. या कचऱ्याचे प्रमाण एवढे मोठे आहे की, शहरात ४५ टक्के सुका कचरा जागच्या जागी पडून असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. यात प्रामुख्याने प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने ते जाळणे; तसेच कुठेही टाकून देणे शक्य नाही. तसेच, त्याची केवळ कॅपिंग मध्येच विल्हेवाट लावणे शक्य असल्याने या कचऱ्याचे काय, हा महापालिकेपुढे सर्वांत मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हा कचरा उचलणे बंद करण्यात आले असून, शहरातील जवळपास ५० टक्के कचरापेट्या ओसंडून वाहत आहेत. हा कचरा रस्त्यावरही आला असून, वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांकडून प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ओला कचरा भरला असल्याने, या कचऱ्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, अनेक ठिकाणी माशा आणि डासांच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.पेठा आणि उपनगरांमध्ये सर्वाधिक ढीग ४शहरात प्रामुख्याने मध्यवर्ती पेठा आणि उपनगरांमध्ये कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व प्रमुख पेठा, तसेच मध्य वस्तीमधील पेठांमध्ये आधीच लहान रस्त्यांवर असलेल्या कचरापेट्या भरून वाहत आहेत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची समस्याही वाढली आहे, तर उपनगरांमध्ये धायरी, वडगाव शेरी, कात्रज, बावधन, पाषाण, सिंहगड रस्ता, औंध, कोंढवा, हडपसर या परिसरात हा कचरा मोठ्या प्रमाणात पडून आहे. दरम्यान, जागाच नसल्याने सुका कचरा पेटवून दिला जात आहे.