शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कर्णकर्कश....आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:59 IST

फटाक्यांची आताषबाजी करून ही मंडळी थांबत नाहीत, तर काही ठिकाणी डिजे लावलेला असतो, तसेच, त्यांची मित्रमंडळी गल्लीबोळातून आणि मुख्य रस्त्यावरून दुचाकीचा जोरजोरात आवाज करत किंचाळत असतात. 

ठळक मुद्देबालके, ज्येष्ठांना मोठा त्रास : मध्यरात्री वाढदिवस करण्याच्या प्रकारात वाढ... तर विकृत संस्कृतीला आळा बसेल 

हडपसर : अलिकडे रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करताना फटाक्यांची आताषबाजी करण्याचे फॅड वाढीस लागले आहे. तसेच दुचाकीच्या सायलन्सरची पुंगळी करून जोरजोरात आवाज काढत वाहने उडविण्याची विकृत संस्कृती रुजू होत असल्याने समाजाचे स्वास्थ्य बिघडत आहे. या त्रासदायक प्रकारामुळे लहान बालके,ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, हृदयरुग्ण यांना ध्वनी प्रदूषणाचा प्रचंड त्रास होत असतो. मोठ्या आवाजामुळे हृदयरोगरुग्णाचा बळीही जाण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा विचित्रप्रकारे वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.हडपसर आणि परिसरात रात्रीच्या बारा वाजता फटाक्यांची आताषबाजी अनेकवेळा ऐकण्यात येते. त्यामुळे निद्रानाश होतो आणि नंतर बराच वेळ झोपही लागत नाही. त्यामुळे स्वास्थ्यावर मोठा परिणाम होतो. या प्रकाराची सकाळी चौकशी केल्यानंतर जवळच एखाद्या कार्यकर्त्यांचा दणक्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी फटाके फोडलेले असतात. फटाक्यांची आताषबाजी करून ही मंडळी थांबत नाहीत, तर काही ठिकाणी डिजे लावलेला असतो, तसेच, त्यांची मित्रमंडळी गल्लीबोळातून आणि मुख्य रस्त्यावरून दुचाकीचा जोरजोरात आवाज करत किंचाळत असतात. ...........................पोलिसांनीच कारवाई करावीरात्री-अपरात्री फटाक्यांचा आवाज आणि प्रकाशाच्या दिशेने रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी धाव घेऊन संबंधितावर गुन्हे दाखल करावेत. मात्र, आमची पोलीस यंत्रणा म्हणते आमच्याकडे कोणी तक्रार केली तरच आम्ही त्याच्या तपास करून गुन्हा दाखल करून कारवाई करतो. त्यामुळे पोलिसांनीच अशा प्रकारच्या घटनेची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे......................... तर विकृत संस्कृतीला आळा बसेल सामाजिक ऐक्याचे भान ठेवून वाढदिवस साजरा केला, तर आनंद द्विगुणित होईल. त्यासाठी गरीब, गरजू मुलांना शालेय साहित्य द्यावे, अनाथ संस्थांमध्ये फळे व कपडे वाटप करावे, केक ही खाण्याचा पदार्थ आहे. तो तोंडाला फासण्याऐवजी तो स्वत:ला खायचा नसेल, तर गरीब किंवा अनाथ संस्थांमध्ये नेऊन तेथील नागरिकांना द्यावा. आरोग्य शिबिर राबवावे, वृक्षारोपण करावे, एखाद्या गरीब व होतकरू मुलाला दत्तक घेऊन त्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली, तर समाजामध्ये चांगला संदेश जाईल. तसेच फटाक्याच्या ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळता येईल आणि विकृत संस्कृतीला आळा बसेल, असे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :HadapsarहडपसरPoliceपोलिसHealthआरोग्य