शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘कुकडी’च्या पाण्यासाठी नागरिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 02:50 IST

माणिकडोेह धरणातील पाणी जुन्नर तालुक्यासाठी राखीव ठेवावे या मागणीसाठी तसेच पाणी सोडण्यासाठी विरोध करण्याचा पवित्रा लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी शनिवारी घेतला.

जुन्नर : कुकडी प्रकल्पांतर्गत जुन्नर तालुक्यातील धरणात असलेला पाणीसाठा, त्यातून करण्यात येणारा विसर्ग हा कळीचा मुद्दा बनला असतानाच शनिवारी (दि. ३0) मणिकडोह धरणातून पाणी सोडण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत पाणी सोडण्यास विरोध केला. शनिवारी रात्री माणिकडोह धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने जलसंपदा विभागातर्फे नियोजन करण्यात येत असल्याने तालुक्यातील लोकप्रतिनिधी व शेतकरी संतप्त झाले होते. या निर्णयाविरोधात तसेच हे पाणी केवळ जुन्नरसाठी राखीव ठेवावे यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी ठिय्या आंदोलन केले. तर विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. नागरिकांचा विरोध बघता धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माणिकडोेह धरणातील पाणी जुन्नर तालुक्यासाठी राखीव ठेवावे या मागणीसाठी तसेच पाणी सोडण्यासाठी विरोध करण्याचा पवित्रा लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी शनिवारी घेतला. आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात रात्री १२ पासून ठिय्या आंदोलन सुरू केले. शिवसेनेचे सुनील मेहेर, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, नगराध्यक्ष शाम पांडे, जुन्नर शहरप्रमुख शिवा खत्री, पाडळीचे सरपंच संतोष केदारी, संतोष घोटणे, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शरद सोनवणे यांनी तालुक्यातून पाणी बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा देतानाच आक्रमक भूमिका घेतली. पाणी सोडण्यात येत असल्याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी त्यांनी चर्चा केली. पाणी येडगाव धरणात सोडण्यात येत असून शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही. 

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे