शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

माळेगाव कारखान्याच्या विहिरीत बुडुन बालकाचा मृत्यू ; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:38 IST

कुटुंबिय,नातेवाइकांची रणवीरच्या बाबतीत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी

ठळक मुद्देघातपाताचा संशय व्यक्त करत बालकाच्या वडिलांची बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार

बारामती : माळेगांव कारखान्याच्या विहिरीत बुडुन पावणेचार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करत बालकाच्या वडिलांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी मुलाचे वडील अ‍ॅड राहुल अशोकराव तावरे (वय  ३७ वर्षे, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. रणवीर राहुल तावरे (वय ३ वर्षे १० महिने) असे विहिरीत बुडुन मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. ९ जुन रोजी रात्री ९.४५ ते ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्या दिवशी रणवीर हा जेवण करून घरातच खेळत होता. काही वेळाने तो घरात व घराच्या आजुबाजूस नसल्याने अ‍ॅड तावरे यांच्यासह घरातील लोकांनी त्याचा सर्वत्र वस्तीवर शोध घेतला ,परंतु तो सापडला नाही. रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास अ‍ॅड. तावरे यांचा चुलत भाऊ प्रताप बबन तावरे हा आला. त्याने घरापासून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या कारखान्याच्या विहिरीमध्ये बॅटरी लावून पाहिले.यावेळी रणवीर विहिरीच्या पाण्यामध्ये पाण्यावर तरंगताना दिसला. त्यास प्रताप तावरे व हर्षवर्धन तावरे यांनी पाण्यातून बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर मुलगा रणवीर याला बारामती येथे उपचारासाठी नेण्यात आले.मात्र,डॉक्टरांनी रणवीर हा पाऊन तासापूर्वी मयत झाल्याचे सांगितले. अ‍ॅड तावरे यांचे कुटुंबिय,नातेवाइकांनी रणवीर याचे बाबतीत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे करीत आहेत.

टॅग्स :Baramatiबारामतीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूPoliceपोलिस