शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त अशोक कुलकर्णी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 19:28 IST

सलग बारा वर्षे विनोद दोशी नाट्य महोत्सव तथा सारंग नाट्य महोत्सवाचे केले आयोजन

ठळक मुद्देनाट्यक्षेत्रात पडद्यमागे उभा राहून उभारली मोलाची कामगिरी

पुणे: साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त आणि भारतभरातल्या सर्वभाषिक प्रायोगिक नाटकमंडळींचे आधारस्तंभ अशोक कुलकर्णी यांचे आज ४ मेला निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. नुकतीच त्यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृतीची गुंतागुत वाढत गेली. त्यांना प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

अशोक कुलकर्णी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण गावात झाले. त्यांनी इंडियन डेमोग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट, फायनान्शियल एक्सप्रेस अशा अनेक संस्थांमध्ये महत्वाच्या पदावर काम केले. या काळात त्यांच्या मुंबईतील वास्तव्यात त्यांचा तत्कालीन प्रयोगशील नाटक आणि सिनेमा करणाऱ्या अनेक कलावंतांशी मैत्री झाली. सत्यदेव दुबे, विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड, गोविंद निहलानी अशा अनेक दिग्गज कलावंताचा तो सुरवातीचा काळ होता. पुढे अशोक कुलकर्णी वालचंद इंडस्ट्रीज मध्ये महत्त्वाच्या पदावर काम करून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरचा काळ हा त्यांनी खऱ्या अर्थाने पुन्हा आपल्या आवडीच्या म्हणजेच नाटकाच्या क्षेत्रात व्यतीत करायचे ठरवले. पडद्यामागे उभे राहून त्यांनी गेल्या वीस वर्षांत अतिशय मोलाची कामगिरी निभावली.

परफॉरमिंग आर्ट या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या तरुण रंगकर्मींचा सन्मान करणारी विनोद दोषी फेलोशिप त्यांनी सुरू केली.  पुढे तेंडुलकर दुबे फेलोशिप आणि मधू गानू फेलोशिप अशा नावाने ह्या फेलोशिप दिल्या गेल्या आहेत. आजवर ७२ जणांना ह्या फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे.

 २००८  ते २०२० सलग बारा वर्षे विनोद दोशी नाट्य महोत्सव तथा सारंग नाट्य महोत्सवाचे आयोजन करून पुणे शहराच्या लौकिकात मोलाची भर घातली. साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने रंगभूमीच्या इतिहासाचा मागोवा घेणारे ' सीन्स वी मेड', तेंडुलकरांच्या लेखन -नाट्य- चित्रपट कारकिर्दीवर अनेकांनी  लिहिलेले 'अजून तेंडुलकर' अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली. त्यातल्या 'प्रायोगिक रंगभूमी- तीन अंक' या पुस्तकाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. नाटककारांची प्रयोगशाळा असा 'रंगभान' नावाचा दीड वर्षे चालणारा उप्रकम त्यांनी चालवला. आताच्या कोविडच्या काळात देखील नाटक करणाऱ्या लोकांना उभारी मिळावी. तसेच त्यांनी नव्या पद्धतीने नाटकाकडे पाहावे यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेartकलाMaharashtraमहाराष्ट्र