शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री-पालकमंत्री वादात पुणेकर वेठीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 03:10 IST

कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आरोप : पाणी कपातीच्या निषेधार्थ आंदोलन

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या वादात पाण्याच्या प्रश्नावरून पुणेकरांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप शनिवारी कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने केला. जलसंपदा प्राधीकरणाने पुण्याला लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे पाणी देण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे पाणी निम्मे कमी होणार आहे. याचा निषेध करण्यासाठी कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने लाक्षणिक उपोषण केले. आमदार अनंतराव गाडगील, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, अभय छाजेड, कमल व्यवहारे, डॉ. सतीश देसाई व दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मंडई येथील आंदोलनात सहभागी झाले होते. नगरसेवक संजय बालगुडे यांनी संयोजन केले होते.

पुण्यासाठी पाण्याचा कोटा मंजूर झाल्यावर तो कमी करण्याचा जलसंपदा प्राधिकरणाला अधिकारच नाही. मात्र, तरीही पुणेकरांना पाण्याबाबत वेठीस धरले जात आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या वादात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पुण्याचे पाणी कमी केले जात आहे, असा आरोप या वेळी केला. ‘ही पाणीकपात नाही, पुणेकरांचा घात आहे’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.पालिकेत सोमवारीहंडा आंदोलन४कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी महापालिकेत महिलांचे हंडा आंदोलन करण्यात येणार आहे. पाण्याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती संजय बालगुडे यांनी दिली.पुण्यात पाण्याची समस्या निर्माण होण्यामागे नियोजनाचा अभाव हीच समस्या असल्याचे एक नगररचना तज्ज्ञ म्हणून माझे मत आहे. १९८७ मध्ये विकास आराखडा तयार करतानाच भविष्यातील लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याचे नियोजन करायला हवे होते. तसे ते केले गेले नाही. एखाद्या कामाकडे गंभीरपणे पाहिले नाही की पुढे अन्य गोष्टींमध्येही समस्या निर्माण होत जातात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. नियोजन करताना याच गोष्टींचा विचार करावा लागतो. जलसंपदा बरोबर आता नव्याने करार करताना महापालिकेने या सर्व गोष्टींचे प्रभावी सादरीकरण केले पाहिजे. त्यात भविष्यात पुणे आणखी वाढणार आहे व येणारे लोकही वाढणार आहेत. ते लक्षात घ्यावे. - रा. ना. गोहाड, ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ 

टॅग्स :Puneपुणे