शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:19 IST

कुंडमाळ येथील पूल दुर्घटनेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

CM Devendra Fadnavis on Maval bridge collapse: मावळ येथील इंद्रायणी नदीवरील ३५ वर्षे जुना पूल कोसळून चार पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल धोकादायक असल्याचे जाहीर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. कुंडमळा पुलावरुन अनेकजण नदीपात्रात पडले होते. रविवार असल्याने पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पर्यटकांच्या वजनामुळे अचानक पूल मधोमध तुटून कोसळला. या घटनेनंतर तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथे माध्यमांशी बोलताना या पुलाचे काम सुरु झालं असतं, तरी इतक्या लवकर तो तयार झाला नसता असं म्हटलं आहे. 

"१० जूनला कंत्राट दिल्यानंतर जरी काम सुरु झालं असतं तरी एवढ्या लवकर तो पूल तयार झाला नसता. जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल धोकादायक आहे अशी घोषणा केली होती. हा पूल धोकादायक असल्याची पाटी गावकऱ्यांनीही लावली होती. दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले. अनेकवळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही. यामध्ये कुणाची नाहीये किंवा इतका तो कमकुवत झालाय असं त्यांना वाटलं नसेल. त्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी गेले. यातून भविष्यासाठी शिकण्याकरता गोष्टी आहेत. पावसाळ्यात पर्यटक जिथे जातात अशा ५०० जागा आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितले. लोकांना सुरक्षित कसे ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी पूल दुर्घटनेबाबत संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरही मुख्यमंत्र्‍यांना प्रश्न विचारला. "काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, काही लोक देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपांचे पडलं आहे. मी अशा लोकांना उत्तर द्यायला बसलेलो नाही," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणेAccidentअपघात