शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
3
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
4
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
5
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
6
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
7
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
8
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
9
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
10
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
11
Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
12
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
13
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार
14
‘२.५ कोटी रुपये पगार असावा आणि...!’ भावी नवऱ्याकडून तरुणीच्या अपेक्षांची मोठी लिस्ट, व्हायरल पोस्ट चर्चेत
15
IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग
16
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
17
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
18
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
19
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका

चासकमान धरण ९२ टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 17:26 IST

काठालगतच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन चासकमान प्रकल्प प्रशासनाने केले आहे....

राजगुरुनगर (पुणे) : खेड आणि शिरूर तालुक्याला वरदान ठरलेले चासकमान धरण शुक्रवारी (दि. २८) दुपारी ४ वाजता ९२ टक्के भरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. चासकमान धरण जलाशयाची पाणी पातळी ६४८.६४ मी आणि साठा  (१९८.७०५ दलघमी ९२.६४%) झाला असून चासकमान प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण आणि पाणी साठ्यात होणारी निरंतर वाढ लक्षात घेता काही तासात धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या आठवड्यात धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यात देखील गेल्या दोन तीन दिवसांत पाऊस वाढला आहे. यामुळे दिवसाला साधारणपणे ७ ते ८ टक्के पाणीसाठा होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार दि २५ रोजी सकाळी ९ वाजता धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ४०० क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे. याद्वारे येथील वीज केंद्र कार्यान्वित झाले आहे. कालव्यात पाणी सोडल्याने खेड, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या पाण्याचे स्वागत करीत समाधान व्यक्त केले आहे.

सध्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा सुरु आहे. पुढील काही तासात धरणातील पाणीसाठा ९३ टक्के पाणी होऊ शकतो. त्यानंतर पाणी वाढल्यास सांडव्यावरून भीमा नदीत विसर्ग सोडण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाकडू सांगण्यात आले. धरणाचे दरवाजे उघडले तर भीमा नदीला पूर येणार आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. काठालगतच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन चासकमान प्रकल्प प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड