शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनशैलीमधे बदल करणे गरजेचे -  अशोकराव गोडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 17:13 IST

प्रत्येक माणसाचे शरीर जर निरोगी, सदृढ राहायचे असेल तर जीवनशैलीमधे बदल करणे गरजेचे आहे. व्यायाम, आहार याकडे लक्ष दिले पाहीजे.

 पुणे - प्रत्येक माणसाचे शरीर जर निरोगी, सदृढ राहायचे असेल तर जीवनशैलीमधे बदल करणे गरजेचे आहे. व्यायाम, आहार याकडे लक्ष दिले पाहीजे. हल्ली जन्मजातच काही रोग होतात. भारतामध्ये सर्वांत जास्त मधुमेहग्रस्त नागरिक असणे, ही खुपच चिंताजनक बाब आहे. प्रत्येकाने आपापल्या शरीराची काळजी घेवून भारत सदृढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांनी व्यक्त केले.

        ह्दयमित्र प्रतिष्ठान आयोजित डॉ. सुहास पांडे लिखित ‘मधुमेह स्त्रिया व ह्दयविकार’ या पुस्तकाचे प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी डॉ.वनिता जगताप, डॉ. संदीप बुटाला, राजाभाऊ घोडके, डॉ. सुहास पांडे, संयोजक श्रीकांत मुंदडा उपस्थित होते.

      श्रीकांत मुदंडा म्हणाले, ह्दयमित्र प्रतिष्ठान महाराष्ट्रभर चांगले काम करत आहे. ह्दयरोग व मधुमेहावर उपचार पध्दती यावर प्रतिष्ठान सातत्याने विनामूल्य प्रशिक्षण देत असते. महिलामध्ये ह्दयविकाराचे प्रमाण वाढले आहे, त्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. मधुमेहाची पुढची पायरी ही ह्दयविकाराची असते. शरीराच्या बाबतीत सर्वानी गांभीर्य घेवून त्याची काळजी घेतली पाहिजे़

         डॉ. एरंडे म्हणाले, मधुमेह हा आजार पूर्वकल्पना न देता होणारा आजार आहे़ जे लोक सातत्याने बसून राहतात़ त्यांच्यामधे मधुमेह हा आजार जास्त बळावतो. स्त्रिया व्यायामाला जास्त महत्व देत नाहीत़ वजनाच्या बाबतीत ते शरीराकडे जास्त लक्ष देत नाहीत़ स्त्रियांना कमी महत्व देण्याची ऐतिहासिक पध्दत यामुळे स्त्रियामध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. आज जगामध्ये ४२ कोटी रूग्ण मधुमेहाचे आहेत़ त्यामध्ये निम्म्या स्त्रिया आहेत़ भारतामधे मधुमेहाचे ७ कोटींच्या  आसपास रूग्ण आहेत. जगामधे दरवर्षी २ करोड मृत्यू मधुमेहामुळे होतात. मानसिक ताणतणाव, नैराश्य, स्थूलपणा, वैद्यकीय सोयीची अपूर्तता यामुळेही मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचे आढळून येत आहे.

टॅग्स :Puneपुणे