शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

जीवनशैलीमधे बदल करणे गरजेचे -  अशोकराव गोडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 17:13 IST

प्रत्येक माणसाचे शरीर जर निरोगी, सदृढ राहायचे असेल तर जीवनशैलीमधे बदल करणे गरजेचे आहे. व्यायाम, आहार याकडे लक्ष दिले पाहीजे.

 पुणे - प्रत्येक माणसाचे शरीर जर निरोगी, सदृढ राहायचे असेल तर जीवनशैलीमधे बदल करणे गरजेचे आहे. व्यायाम, आहार याकडे लक्ष दिले पाहीजे. हल्ली जन्मजातच काही रोग होतात. भारतामध्ये सर्वांत जास्त मधुमेहग्रस्त नागरिक असणे, ही खुपच चिंताजनक बाब आहे. प्रत्येकाने आपापल्या शरीराची काळजी घेवून भारत सदृढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांनी व्यक्त केले.

        ह्दयमित्र प्रतिष्ठान आयोजित डॉ. सुहास पांडे लिखित ‘मधुमेह स्त्रिया व ह्दयविकार’ या पुस्तकाचे प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी डॉ.वनिता जगताप, डॉ. संदीप बुटाला, राजाभाऊ घोडके, डॉ. सुहास पांडे, संयोजक श्रीकांत मुंदडा उपस्थित होते.

      श्रीकांत मुदंडा म्हणाले, ह्दयमित्र प्रतिष्ठान महाराष्ट्रभर चांगले काम करत आहे. ह्दयरोग व मधुमेहावर उपचार पध्दती यावर प्रतिष्ठान सातत्याने विनामूल्य प्रशिक्षण देत असते. महिलामध्ये ह्दयविकाराचे प्रमाण वाढले आहे, त्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. मधुमेहाची पुढची पायरी ही ह्दयविकाराची असते. शरीराच्या बाबतीत सर्वानी गांभीर्य घेवून त्याची काळजी घेतली पाहिजे़

         डॉ. एरंडे म्हणाले, मधुमेह हा आजार पूर्वकल्पना न देता होणारा आजार आहे़ जे लोक सातत्याने बसून राहतात़ त्यांच्यामधे मधुमेह हा आजार जास्त बळावतो. स्त्रिया व्यायामाला जास्त महत्व देत नाहीत़ वजनाच्या बाबतीत ते शरीराकडे जास्त लक्ष देत नाहीत़ स्त्रियांना कमी महत्व देण्याची ऐतिहासिक पध्दत यामुळे स्त्रियामध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. आज जगामध्ये ४२ कोटी रूग्ण मधुमेहाचे आहेत़ त्यामध्ये निम्म्या स्त्रिया आहेत़ भारतामधे मधुमेहाचे ७ कोटींच्या  आसपास रूग्ण आहेत. जगामधे दरवर्षी २ करोड मृत्यू मधुमेहामुळे होतात. मानसिक ताणतणाव, नैराश्य, स्थूलपणा, वैद्यकीय सोयीची अपूर्तता यामुळेही मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचे आढळून येत आहे.

टॅग्स :Puneपुणे