शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांचे कंपनी विरोधात चक्री उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 02:25 IST

कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील आॅनर कंपनीच्या विरोधात यामध्ये काम करीत असणाऱ्या नऊ कामगारांना कामावर परत घेणे, चार वर्षांचा पीएफ मिळणे व अन्य काही मागण्यांकरिता कामगार कंपनीच्या परिसरात चक्री उपोषणाला बसले असून हक्क मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचे मत या कामगारांनी व्यक्त केले आहे.

कुरकुंभ - कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील आॅनर कंपनीच्या विरोधात यामध्ये काम करीत असणाऱ्या नऊ कामगारांना कामावर परत घेणे, चार वर्षांचा पीएफ मिळणे व अन्य काही मागण्यांकरिता कामगार कंपनीच्या परिसरात चक्री उपोषणाला बसले असून हक्क मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचे मत या कामगारांनी व्यक्त केले आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये अ‍े -८८ मधील आॅनर ह्या कंपनीत ओम इंजिनिअरींग नावाने असणाºया कंत्राटात वरील उपोषणास बसलेले कामगार काम करीत होते. मात्र, काही कारणास्तव वरील कंत्राटदाराने आपले कंत्राट सोडून दिल्याने हे कामगार देखील कामावरून बाहेर झाले. मात्र, हे कामगार तालुक्यातील असल्याने त्यांनी आम्ही जवळपास चार वषार्पासून कामाला आहोत. त्यामुळे कंत्राटदार जरी गेला असला तरी आम्हाला कामावर घ्यावे अशी मागणी केली. मात्र, कंपनीने ती अमान्य केली आहे. परिणामी केलेल्या चार वर्षाच्या कामाचा योग्य मोबदला त्यांना मिळावा यासाठी त्यांनी हे उपोषण सुरु केले आहे.दिवसेंदिवस कामगार कायद्यात झालेल्या बदलाने खाजगी कारखानदार कंत्राट पद्धतीचा वापर करीत आहेत. त्यामुळे कंत्राटाची मर्यादा संपली कि कामगार कामावरून बेदखल होत आहेत. सर्वच ठिकाणी असंघटीत कामगार संखेत वाढ होत असल्याने कामगारांच्या बºयाच मागण्या ह्या व्यवस्थापनाकडून ग्राह्य धरल्या जात नाहीत. परिणामी कामगार व कंपनी व्यवस्थापन हा वाद नेहमीच होताना दिसून येतो. दरम्यान कामगार हा नेहमीच कामाची जागा अगदी अल्पावधीत बदलत असल्याने त्यामुळेही बºयाचदा त्यांना कायमस्वरूपी होणे अवघड असते.वरील चक्री उपोषण करणाºया कामगारांनी कामगार न्यायालयात धाव घेवून त्यांच्यावर झालेल्या अन्याय विरोधात दाद मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ असल्याने याबाबत नक्की काय निकाल येणार हा अजून येणारा काळ सांगणार आहे. मात्र तो पर्यंत सुरु झालेल्या ह्या उपोषणाने कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्या मधील दुरावा आणखीनच वाढवला आहे यात शंका नाही मात्र या संघर्षात कामगार व व्यवस्थापन याचं नुकसान होणार हे निश्चित आहे.आम्ही गेल्या चार वर्षापासून या कंपनीत कामास आहोत. कंत्राटदार मार्फत कामास असलो तरी आम्ही स्थानिक आहोत. कंत्राट जरी संपले असले तरी आमच्या बाबतीत साकाराकात्मक विचार करणे गरजेचे आहे. चार वर्षातील पी एफ व अन्य झालेल्या नुकसानभरपाई देण्यात यावी.- हनुमंत निगडे, पिडीत कामगारकंपनीने पाहिले सहा महिने प्रायोगिक तत्वावर काम दिले होते व पुढील काळात सर्व शासकीय नियमानुसार वेतन व अन्य कामगार हिताचे नियम सुरु करून देणार होते मात्र कंपनीने चार वर्षापर्यंत काहीच दिले नाही परिणामी काम सोडण्यास भाग पडले.- रामराव गिरिमकर,कंत्राटदार ओम इंजीनिअरिंगकामगार हे कंपनीच्या मार्फत दिल्या गेलेल्या ओम इंजिनिअरिंग या कंत्राटदार कंपनी कडे होते. या कंत्राटदार कंपनीने स्वत:हून त्यांचे काम सोडून दिल्याने हे कामगार कामावरून बंद झाले आहेत. प्रत्यक्षरित्या त्यांचा व कंपनीचा काही एक सबंध नाही. त्याला स्वर्वस्वी कंत्राटदार जबाबदार असून सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यावरच याबाबत आणखी बोलणे उचीत राहील.- दस्तगीर मुजावर, व्यवस्थापन अधिकारी आॅनर.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या