शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कंत्राटी कामगारांचे कंपनी विरोधात चक्री उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 02:25 IST

कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील आॅनर कंपनीच्या विरोधात यामध्ये काम करीत असणाऱ्या नऊ कामगारांना कामावर परत घेणे, चार वर्षांचा पीएफ मिळणे व अन्य काही मागण्यांकरिता कामगार कंपनीच्या परिसरात चक्री उपोषणाला बसले असून हक्क मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचे मत या कामगारांनी व्यक्त केले आहे.

कुरकुंभ - कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील आॅनर कंपनीच्या विरोधात यामध्ये काम करीत असणाऱ्या नऊ कामगारांना कामावर परत घेणे, चार वर्षांचा पीएफ मिळणे व अन्य काही मागण्यांकरिता कामगार कंपनीच्या परिसरात चक्री उपोषणाला बसले असून हक्क मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचे मत या कामगारांनी व्यक्त केले आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये अ‍े -८८ मधील आॅनर ह्या कंपनीत ओम इंजिनिअरींग नावाने असणाºया कंत्राटात वरील उपोषणास बसलेले कामगार काम करीत होते. मात्र, काही कारणास्तव वरील कंत्राटदाराने आपले कंत्राट सोडून दिल्याने हे कामगार देखील कामावरून बाहेर झाले. मात्र, हे कामगार तालुक्यातील असल्याने त्यांनी आम्ही जवळपास चार वषार्पासून कामाला आहोत. त्यामुळे कंत्राटदार जरी गेला असला तरी आम्हाला कामावर घ्यावे अशी मागणी केली. मात्र, कंपनीने ती अमान्य केली आहे. परिणामी केलेल्या चार वर्षाच्या कामाचा योग्य मोबदला त्यांना मिळावा यासाठी त्यांनी हे उपोषण सुरु केले आहे.दिवसेंदिवस कामगार कायद्यात झालेल्या बदलाने खाजगी कारखानदार कंत्राट पद्धतीचा वापर करीत आहेत. त्यामुळे कंत्राटाची मर्यादा संपली कि कामगार कामावरून बेदखल होत आहेत. सर्वच ठिकाणी असंघटीत कामगार संखेत वाढ होत असल्याने कामगारांच्या बºयाच मागण्या ह्या व्यवस्थापनाकडून ग्राह्य धरल्या जात नाहीत. परिणामी कामगार व कंपनी व्यवस्थापन हा वाद नेहमीच होताना दिसून येतो. दरम्यान कामगार हा नेहमीच कामाची जागा अगदी अल्पावधीत बदलत असल्याने त्यामुळेही बºयाचदा त्यांना कायमस्वरूपी होणे अवघड असते.वरील चक्री उपोषण करणाºया कामगारांनी कामगार न्यायालयात धाव घेवून त्यांच्यावर झालेल्या अन्याय विरोधात दाद मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ असल्याने याबाबत नक्की काय निकाल येणार हा अजून येणारा काळ सांगणार आहे. मात्र तो पर्यंत सुरु झालेल्या ह्या उपोषणाने कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्या मधील दुरावा आणखीनच वाढवला आहे यात शंका नाही मात्र या संघर्षात कामगार व व्यवस्थापन याचं नुकसान होणार हे निश्चित आहे.आम्ही गेल्या चार वर्षापासून या कंपनीत कामास आहोत. कंत्राटदार मार्फत कामास असलो तरी आम्ही स्थानिक आहोत. कंत्राट जरी संपले असले तरी आमच्या बाबतीत साकाराकात्मक विचार करणे गरजेचे आहे. चार वर्षातील पी एफ व अन्य झालेल्या नुकसानभरपाई देण्यात यावी.- हनुमंत निगडे, पिडीत कामगारकंपनीने पाहिले सहा महिने प्रायोगिक तत्वावर काम दिले होते व पुढील काळात सर्व शासकीय नियमानुसार वेतन व अन्य कामगार हिताचे नियम सुरु करून देणार होते मात्र कंपनीने चार वर्षापर्यंत काहीच दिले नाही परिणामी काम सोडण्यास भाग पडले.- रामराव गिरिमकर,कंत्राटदार ओम इंजीनिअरिंगकामगार हे कंपनीच्या मार्फत दिल्या गेलेल्या ओम इंजिनिअरिंग या कंत्राटदार कंपनी कडे होते. या कंत्राटदार कंपनीने स्वत:हून त्यांचे काम सोडून दिल्याने हे कामगार कामावरून बंद झाले आहेत. प्रत्यक्षरित्या त्यांचा व कंपनीचा काही एक सबंध नाही. त्याला स्वर्वस्वी कंत्राटदार जबाबदार असून सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यावरच याबाबत आणखी बोलणे उचीत राहील.- दस्तगीर मुजावर, व्यवस्थापन अधिकारी आॅनर.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या