शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

चाकणला मिळणार भामा आसखेडचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : भामा आसखेड धरणातून बंद पाइपलाइनद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या सुमारे ६० कोटी२१ लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : भामा आसखेड धरणातून बंद पाइपलाइनद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या सुमारे ६० कोटी२१ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. याचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली.

चाकण शहराला भामाआसखेड धरणातील पाणी एमजीपीकडून काही भागात तर भामा नदीतून जलशुध्दीकरण करून उर्वरित भागासाठी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु चाकण औद्योगिक वसाहतीमुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सध्याची व भविष्यात वाढणारी लोकसंख्या विचारात घेतल्यास शहराला स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेची गरजेची होती. यासाठी स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांनी शासन दरबारी दोन वर्षे पाठपुरावा केला होता. संबधित विभागाच्या मंत्र्यांना भेटून पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. नगरपरिषदेने या योजनेसाठी दहा टक्के रक्कम असे ६० लाख रुपये भरणा केला असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे. चाकण शहराची लोकसंख्या जवळपास दोन लाखांच्या आसपास झाली असून तरंगती लोकसंख्या विचारात घेता साधारण एक लक्ष लोकसंख्येला पाणी पुरवठ्याचा विचार करूनच भामा आसखेड धरणावरून ही सुधारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे पत्र उपअभियंता संजय पाठक यांनी दिले आहे. सध्या शासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर पुढील काही महिन्यात प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी ६० कोटी २१ लाख रुपये खर्च येणार आहे. सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भामा आसखेड धरणावरून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात पूर्ण क्षमतेने नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या भरण्यात येणार आहे. चाकण शहरासाठी धरणात पाणीसाठा राखीव ठेवण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वी मंजुरी दिली आहे.

* चाकण शहराला सध्या एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे यामध्ये पहिल्या दिवशी आंबेठाण रोड, राणूबाई मळा, देशमुखआळी, दावडमळा, भुजबळआळी व संपूर्ण शिक्रापूर रस्ता या भागासाठी भामाआसखेड धरणातून महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांच्याकडून पुरवठा करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी - संपूर्ण चाकण गावठाण, एकतानगर, आगरवाडी, राक्षेवाडी,पठारवाडी, माळआळी, बाजारपेठ व खंडोबामाळ आदी परिसरासाठी भामानदीवरील बंधार्यातील पाणी जॅकवेल मार्फत जलशुध्दीकरण केंद्रातील टाक्यांमधून पाणी नागरिकांना पुरवठा करण्यात येत आहे.

चौकट

सध्या दर दिवसाकरिता संपूर्ण शहरासाठी १०.३ एमएलडी पाणी आवश्यक आहे. परंतू ऐवढे पाणी उपलब्ध होत नसल्याने दिवसाआड पाणी पुरवठा करून, सर्व शहरातील नागरिकांना व्यवस्थित पुरेल असा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

चौकट

चाकण शहराची लोकसंख्या वाढत असल्याने भविष्यात शहराला स्वतंत्र पाणी योजना व्हावी, तसेच भामाआसखेड धरणातील ठराविक टक्के पाणी आरक्षित करण्यासाठी स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांनी विशेष प्रयत्न केल्यानेच हे काम मार्गी लागत आहे. यासाठी तत्कालीन सर्व पक्षीय नगरसेवकांचे सहकार्य मिळाले आहे. येणाऱ्या काळात चाकणकरांना शुध्द,स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे.