शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

चाकणला मिळणार भामा आसखेडचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : भामा आसखेड धरणातून बंद पाइपलाइनद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या सुमारे ६० कोटी२१ लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : भामा आसखेड धरणातून बंद पाइपलाइनद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या सुमारे ६० कोटी२१ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. याचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली.

चाकण शहराला भामाआसखेड धरणातील पाणी एमजीपीकडून काही भागात तर भामा नदीतून जलशुध्दीकरण करून उर्वरित भागासाठी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु चाकण औद्योगिक वसाहतीमुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सध्याची व भविष्यात वाढणारी लोकसंख्या विचारात घेतल्यास शहराला स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेची गरजेची होती. यासाठी स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांनी शासन दरबारी दोन वर्षे पाठपुरावा केला होता. संबधित विभागाच्या मंत्र्यांना भेटून पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. नगरपरिषदेने या योजनेसाठी दहा टक्के रक्कम असे ६० लाख रुपये भरणा केला असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे. चाकण शहराची लोकसंख्या जवळपास दोन लाखांच्या आसपास झाली असून तरंगती लोकसंख्या विचारात घेता साधारण एक लक्ष लोकसंख्येला पाणी पुरवठ्याचा विचार करूनच भामा आसखेड धरणावरून ही सुधारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे पत्र उपअभियंता संजय पाठक यांनी दिले आहे. सध्या शासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर पुढील काही महिन्यात प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी ६० कोटी २१ लाख रुपये खर्च येणार आहे. सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भामा आसखेड धरणावरून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात पूर्ण क्षमतेने नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या भरण्यात येणार आहे. चाकण शहरासाठी धरणात पाणीसाठा राखीव ठेवण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वी मंजुरी दिली आहे.

* चाकण शहराला सध्या एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे यामध्ये पहिल्या दिवशी आंबेठाण रोड, राणूबाई मळा, देशमुखआळी, दावडमळा, भुजबळआळी व संपूर्ण शिक्रापूर रस्ता या भागासाठी भामाआसखेड धरणातून महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांच्याकडून पुरवठा करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी - संपूर्ण चाकण गावठाण, एकतानगर, आगरवाडी, राक्षेवाडी,पठारवाडी, माळआळी, बाजारपेठ व खंडोबामाळ आदी परिसरासाठी भामानदीवरील बंधार्यातील पाणी जॅकवेल मार्फत जलशुध्दीकरण केंद्रातील टाक्यांमधून पाणी नागरिकांना पुरवठा करण्यात येत आहे.

चौकट

सध्या दर दिवसाकरिता संपूर्ण शहरासाठी १०.३ एमएलडी पाणी आवश्यक आहे. परंतू ऐवढे पाणी उपलब्ध होत नसल्याने दिवसाआड पाणी पुरवठा करून, सर्व शहरातील नागरिकांना व्यवस्थित पुरेल असा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

चौकट

चाकण शहराची लोकसंख्या वाढत असल्याने भविष्यात शहराला स्वतंत्र पाणी योजना व्हावी, तसेच भामाआसखेड धरणातील ठराविक टक्के पाणी आरक्षित करण्यासाठी स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांनी विशेष प्रयत्न केल्यानेच हे काम मार्गी लागत आहे. यासाठी तत्कालीन सर्व पक्षीय नगरसेवकांचे सहकार्य मिळाले आहे. येणाऱ्या काळात चाकणकरांना शुध्द,स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे.