शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

चाकणला मिळणार भामा आसखेडचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : भामा आसखेड धरणातून बंद पाइपलाइनद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या सुमारे ६० कोटी२१ लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : भामा आसखेड धरणातून बंद पाइपलाइनद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या सुमारे ६० कोटी२१ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. याचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली.

चाकण शहराला भामाआसखेड धरणातील पाणी एमजीपीकडून काही भागात तर भामा नदीतून जलशुध्दीकरण करून उर्वरित भागासाठी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु चाकण औद्योगिक वसाहतीमुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सध्याची व भविष्यात वाढणारी लोकसंख्या विचारात घेतल्यास शहराला स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेची गरजेची होती. यासाठी स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांनी शासन दरबारी दोन वर्षे पाठपुरावा केला होता. संबधित विभागाच्या मंत्र्यांना भेटून पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. नगरपरिषदेने या योजनेसाठी दहा टक्के रक्कम असे ६० लाख रुपये भरणा केला असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे. चाकण शहराची लोकसंख्या जवळपास दोन लाखांच्या आसपास झाली असून तरंगती लोकसंख्या विचारात घेता साधारण एक लक्ष लोकसंख्येला पाणी पुरवठ्याचा विचार करूनच भामा आसखेड धरणावरून ही सुधारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे पत्र उपअभियंता संजय पाठक यांनी दिले आहे. सध्या शासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर पुढील काही महिन्यात प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी ६० कोटी २१ लाख रुपये खर्च येणार आहे. सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भामा आसखेड धरणावरून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात पूर्ण क्षमतेने नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या भरण्यात येणार आहे. चाकण शहरासाठी धरणात पाणीसाठा राखीव ठेवण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वी मंजुरी दिली आहे.

* चाकण शहराला सध्या एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे यामध्ये पहिल्या दिवशी आंबेठाण रोड, राणूबाई मळा, देशमुखआळी, दावडमळा, भुजबळआळी व संपूर्ण शिक्रापूर रस्ता या भागासाठी भामाआसखेड धरणातून महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांच्याकडून पुरवठा करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी - संपूर्ण चाकण गावठाण, एकतानगर, आगरवाडी, राक्षेवाडी,पठारवाडी, माळआळी, बाजारपेठ व खंडोबामाळ आदी परिसरासाठी भामानदीवरील बंधार्यातील पाणी जॅकवेल मार्फत जलशुध्दीकरण केंद्रातील टाक्यांमधून पाणी नागरिकांना पुरवठा करण्यात येत आहे.

चौकट

सध्या दर दिवसाकरिता संपूर्ण शहरासाठी १०.३ एमएलडी पाणी आवश्यक आहे. परंतू ऐवढे पाणी उपलब्ध होत नसल्याने दिवसाआड पाणी पुरवठा करून, सर्व शहरातील नागरिकांना व्यवस्थित पुरेल असा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

चौकट

चाकण शहराची लोकसंख्या वाढत असल्याने भविष्यात शहराला स्वतंत्र पाणी योजना व्हावी, तसेच भामाआसखेड धरणातील ठराविक टक्के पाणी आरक्षित करण्यासाठी स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांनी विशेष प्रयत्न केल्यानेच हे काम मार्गी लागत आहे. यासाठी तत्कालीन सर्व पक्षीय नगरसेवकांचे सहकार्य मिळाले आहे. येणाऱ्या काळात चाकणकरांना शुध्द,स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे.