शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

केंद्र सरकारचे साखरेचे पॅकेज फसवे : हर्षवर्धन पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:24 IST

साखर उत्पादनाचा देश व राज्यपातळीवरील अंदाज चुकल्याने साखरेचे भाव खाली आले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने ८० लाख टन साखर निर्यात करावी.शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास अडचणी कायम

पुणे : केंद्र सरकारने जाहीर केलेले ८ हजार ५०० कोटी रूपयांचे पॅकेज फसवे आहे. ही रक्कम ४ हजार ४७ कोटी रुपयांची असताना त्याचे वेगवेगळे आकडे जाहीर करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास अडचणी कायम आहे. पुढील गाळप हंंगाम घेणे कारखान्यांना अडचणीचे असून केंद्रसरकारने वाढीव पॅकेज द्यावे अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी करताना साखरे बाबतचे सरकारचे धोरणच चुकीचे आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.  राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना किफायतशीर आणि रास्त दरापोटी (एफआरपी) अजूनही १८०० कोटी रुपये दिलेले नाही. इथेनॉलचा ४० रूपयांचा प्रति लिटरचा दर वाढवून ५३ रुपये करावा. तसेच साखरेचा प्रतिक्विंटलमागे निर्धारित केलेला भाव २९०० रुपयांवरुन ३ हजार २०० रुपये करावा अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली. साखर उद्योग अडचणीत असताना पाकिस्तानातून ३ लाख मेट्रीक टन साखर आयात करण्यात आली असून परदेशातून २१ लाख मेट्रीक टन कच्ची साखर आयात झाली आहे. ही कच्ची साखर प्रक्रिया करून बाहेर जाणे अपेक्षित होते. मात्र देशांंतर्गत बाजारातच तिची विक्री झाल्यामुळेच साखरेचे भाव पडले असल्याचे ते म्हणाले.  पाटील म्हणाले, साखर उत्पादनाचा देश व राज्यपातळीवरील अंदाज चुकल्याने साखरेचे भाव खाली आले आहेत. यंदाच्या हंगामात २६० लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ३२७ लाख टन उत्पादन झाले आहे. राज्यातही ७२ ते ७६ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. प्रत्यक्षात १०७ लाख मेट्रीक टन उत्पादन झाले. वाढलेल्या उत्पादनामुळे साखरेच्या भावात भाव घट झाली. त्यामुळे उसाची एफआरपी द्यायची कशी असा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ८० लाख टन साखर निर्यात करावी. त्यासाठी दिलेले प्रति टन अनुदान ५५ रुपयांऐवजी शंभर रुपये करावे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारcongressकाँग्रेस