शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

केंद्रातील सरकार लोकशाहीविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे स्वातंत्र्यानंतर इतके महिने सुरू असलेले पहिलेच सार्वजनिक आंदोलन आहे, तरीही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे स्वातंत्र्यानंतर इतके महिने सुरू असलेले पहिलेच सार्वजनिक आंदोलन आहे, तरीही केंद्र सरकार लक्ष देत नाही. हे सरकार लोकशाहीविरोधी सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी आमदार बसवराज पाटील यांनी केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या विरोधात देशातील स्वयंसेवी संस्था संघटनांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंद कार्यक्रमाला काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यासाठी काँग्रेस भवनमध्ये एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. पाटील यांच्या उपस्थितीत उपोषणाला सुरूवात झाली.

तत्पूर्वी पत्रकारांबरोबर बोलताना पाटील यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली. लोकशाहीला गुंडाळून ठेवून मनमानी करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप करून पाटील म्हणाले, दिल्लीत शेतकरी ४ महिने आंदोलन करत आहेत, सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. कामगार कायदे बदलले, ते रद्द करण्याची मागणी होत आहे, त्यावरही सरकार काही करत नाही. त्यामुळेच काँग्रेसने भारत बंदला पाठिंबा म्हणून एक दिवसाचे उपोषण करत आहे.

राज्यातील सरकारला कसलाही धोका नाही, असा दावा पाटील यांनी केला. काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळते, विश्वासात घेत नाही या सर्व अफवा आहेत, सरकार अगदी व्यवस्थित सुरू आहे, असे ते म्हणाले.

शहराध्यक्ष रमेश बागवे परगावी असल्याने अनुपस्थित होते. पालिकेतील गटनेते आबा बागुल, रत्नाकर महाजन, माजी आमदार दीप्ती चवधरी, अविनाश बागवे, अॅड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, अरविंद शिंदे, सचिन साठे, सोनाली मारणे, संगीता तिवारी, रमेश अय्यर या वेळी उपस्थित होते. काँग्रेस भवनच्या आवारात सगळे मंडप टाकून उपोषणाला बसले होते. दुपारी ४ वाजता उपोषण थांबवण्यात आले.