शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शहिदांना मानवंदना देत ४८ वा 'विजय' दिवस उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 18:34 IST

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन

ठळक मुद्देराष्ट्रीय युद्ध स्मारक येथे कार्यक्रम : लष्करी शिस्तीत हुतात्म्यांना आदरांजली

पुणे : गुलाबी थंडी... लष्करी शिस्त आणि देशभक्तिपर गाण्यांच्या चालींवर लष्करातील अधिकारी आणि जवानांनी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना सोमवारी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे मानवंदना देत ४८ वा विजय दिवस उत्साहात साजरा केला. या वेळी भारतमातेच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना वंदन करण्यासाठी सामान्य नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी (दि. १६) विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी पुष्पचक्र अर्पण करून युद्धात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना वाहिली. या प्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, माजी हवाईदल प्रमुख पी. व्ही. नाईक, निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर तसेच १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या निवृत्त अधिकारी आणि जवानांनी पुष्पचक्र वाहून शहिदांना आदरांजली दिली.  ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या १३ दिवसांच्या काळात १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध लढले गेले. पाकिस्तानकडून भारताच्या अकरा हवाई अड्ड्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे या युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा भारतीय सैन्यांनी उडवत पाकिस्तानला नमवत पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशची निर्मिती केली.  तब्बल ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्र खाली ठेवत भारतीय फौजांपुढे शरण आले. या युद्धात दक्षिण मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जवानांनी देशाच्या सीमारेषांचे रक्षण करण्यासाठी मोठे योगदान दिले. या युद्धात लौंगेवाला येथे झालेल्या लढाईचा विशेष उल्लेख केला जातो. लष्कराच्या अत्युच्च साहस, शौर्य आणि त्यागाचे प्रतीक म्हणून इतिहासात १९७१ च्या युद्धाचा उल्लेख करण्यात आला आहे.

................विद्यार्थ्यांनी गायली देशभक्तीपर गाणी१९७१ च्या युद्धातील जवानांना आदरांजली वाहण्यासाठी पुण्यातीळ विविध केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय युध्द स्मारक येथील मानवंदनेच्या कार्यक्रमात देशभक्तिपर गीते गायली. त्यांना उपस्थित लष्करी अधिका-यांनी प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतूक केले. याच बरोबर राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल सैनी यांनी या विद्यार्थ्यांची संवाद साधला. 

 

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानwarयुद्ध