शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

शहिदांना मानवंदना देत ४८ वा 'विजय' दिवस उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 18:34 IST

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन

ठळक मुद्देराष्ट्रीय युद्ध स्मारक येथे कार्यक्रम : लष्करी शिस्तीत हुतात्म्यांना आदरांजली

पुणे : गुलाबी थंडी... लष्करी शिस्त आणि देशभक्तिपर गाण्यांच्या चालींवर लष्करातील अधिकारी आणि जवानांनी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना सोमवारी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे मानवंदना देत ४८ वा विजय दिवस उत्साहात साजरा केला. या वेळी भारतमातेच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना वंदन करण्यासाठी सामान्य नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी (दि. १६) विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी पुष्पचक्र अर्पण करून युद्धात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना वाहिली. या प्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, माजी हवाईदल प्रमुख पी. व्ही. नाईक, निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर तसेच १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या निवृत्त अधिकारी आणि जवानांनी पुष्पचक्र वाहून शहिदांना आदरांजली दिली.  ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या १३ दिवसांच्या काळात १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध लढले गेले. पाकिस्तानकडून भारताच्या अकरा हवाई अड्ड्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे या युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा भारतीय सैन्यांनी उडवत पाकिस्तानला नमवत पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशची निर्मिती केली.  तब्बल ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्र खाली ठेवत भारतीय फौजांपुढे शरण आले. या युद्धात दक्षिण मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जवानांनी देशाच्या सीमारेषांचे रक्षण करण्यासाठी मोठे योगदान दिले. या युद्धात लौंगेवाला येथे झालेल्या लढाईचा विशेष उल्लेख केला जातो. लष्कराच्या अत्युच्च साहस, शौर्य आणि त्यागाचे प्रतीक म्हणून इतिहासात १९७१ च्या युद्धाचा उल्लेख करण्यात आला आहे.

................विद्यार्थ्यांनी गायली देशभक्तीपर गाणी१९७१ च्या युद्धातील जवानांना आदरांजली वाहण्यासाठी पुण्यातीळ विविध केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय युध्द स्मारक येथील मानवंदनेच्या कार्यक्रमात देशभक्तिपर गीते गायली. त्यांना उपस्थित लष्करी अधिका-यांनी प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतूक केले. याच बरोबर राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल सैनी यांनी या विद्यार्थ्यांची संवाद साधला. 

 

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानwarयुद्ध