शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

एक एकर ऊसपीक गेले वाहून , शेतकºयाचे नुकसान, ५० शेतक-यांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:14 IST

वालचंदनगर : रणगाव अंथुर्णे हद्दीत कमी क्षमतेचा बंधारा बांधण्यात आल्याने परिसरातील ५० शेतकºयांना फटका बसला आहे. अनंतराव सावंत यांच्या शेतीत बंधाºयाचे पाणी शिरल्याने १ एकर ऊस मातीसह वाहून गेल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे.काट्याची शेती म्हणून ओळखली जाणाºया ओढ्यावर गेल्या ६ महिन्यांपूर्वी बंधारा बांधण्यात आलेला आहे. हा बंधारा पाण्याची क्षमता ...

वालचंदनगर : रणगाव अंथुर्णे हद्दीत कमी क्षमतेचा बंधारा बांधण्यात आल्याने परिसरातील ५० शेतकºयांना फटका बसला आहे. अनंतराव सावंत यांच्या शेतीत बंधाºयाचे पाणी शिरल्याने १ एकर ऊस मातीसह वाहून गेल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे.काट्याची शेती म्हणून ओळखली जाणाºया ओढ्यावर गेल्या ६ महिन्यांपूर्वी बंधारा बांधण्यात आलेला आहे. हा बंधारा पाण्याची क्षमता लक्षात न घेताच बांधला असल्याची शेतकºयांची तक्रार आहे. या शेतकºयांना संबंधित अधिकाºयाने भरपाई द्यावी, अन्यथा संबंधित आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.शेतकºयांच्या हितासाठी म्हणून कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलेला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस झाल्याने बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे तो पूर्वेकडील भागावर फुटला. त्याचे ओढ्याच्या पुरासारखे पाणी सावंत यांच्या शेतीतून वाहत आहे. संपूर्ण शेतीतील उसासह माती वाहून गेल्याने शेती होती का नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बंधाºयात पाणी थांबल्याने ५० शेतकºयांचा संपर्क तुटला आहे. मोठी हानी झाली आहे. त्यामुळेच नुकसानभरपाईची मागणी होत आहे.लोकप्रतिनिधींना ना खेद ना खंत!संबंधित शेतक-यांच्या शेतीचे नुकसान झाल्यानंतरदेखील कोणताही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी शेतकºयांच्या दु:खाचा विचार करत नसल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. शेतातील मातीसह ऊस वाहून गेल्याने जमिनीची किंमत संबंधित अधिकाºयांनी द्यावी. शेतक-यांचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाल्याने त्वरित उपाय करण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे अनंतराव सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे