शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

शाळाबाह्य मुलांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:13 IST

शाळाबाह्य मुलांचे या दुर्धर संकटात काय झाले असेल, या विचारांनी मन अक्षरश: भयभीत होते. शाळाबाह्य मुले दारिद्र्य आणि ...

शाळाबाह्य मुलांचे या दुर्धर संकटात काय झाले असेल, या विचारांनी मन अक्षरश: भयभीत होते. शाळाबाह्य मुले दारिद्र्य आणि सामाजिक अभिशापाची फलनिष्पत्ती असतात. हजारो प्रयास करूनही राज्यात चार ते पाच लाख विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे अनेक पाहण्यांमधून आढळून आले आहे. शिक्षण व्यवस्था सुरळीत असताना देखील ही शाळाबाह्य मुले-मुली शाळेत येत नाहीत. वीटभट्टीवर, ऊसतोडणीसाठी, बांधकाम कामावर, शेती कामावर लघुउद्योगावर अशा ठिकाणी शिक्षण घेण्यायोग्य वयातील मुले काम करताना आढळतात. गरीब कुटुंबाला या मुलांकडून थोडा का होईना हातभार लागतो. मात्र, ही राष्ट्राची अनमोल संपत्ती शिक्षणापासून वंचित राहते. कोरोनापूर्व सामान्य परिस्थितीमध्ये शाळा जेव्हा सुरळीत सुरू होत्या, तेव्हा देखील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे अतिशय कठीण आणि जिकिरीचे काम होते. शाळेत नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडले, तिथे उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित बालकांचे काय हाल होत असतील, या विचाराने अंगावर काटा उभा राहतो.

राज्यातील सुमारे पाच लाख शाळाबाह्य मुलांचे ना ऑनलाइन शिक्षण झाले ना ऑफलाइन शिक्षण झाले. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ शासन निर्णयात एक महिना सलग शाळेत न येणाऱ्या बालकांना शाळाबाह्य म्हणून गृहीत धरले जाते. अशी बालके एकदा शाळाबाह्य झाली की त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेणे कठीण जाते. कोरोना लॉकडाऊन आणि आताच्या या काळात नियमित शाळेत येणारी बालके देखील शाळाबाह्यसदृश झाली आहेत. काही नियमित विद्यार्थी शाळा सोडण्याच्या कुंपणावर आहेत, तर अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाली आहेत.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या संख्येत सुद्धा आता नवी भर पडून या विद्यार्थ्यांची संख्या आठ ते दहा लाखांपर्यंत झालेली असावी; यात तिळमात्र शंका वाटत नाही. मूळची शाळाबाह्य मुले या काळात आता पूर्ण निरक्षर झाली आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी पुन्हा शाळेत येतील, याची खात्री वाटत नाही. शाळाबाह्य मुलांचे रूपांतर या शाळा बंद असल्याने कोरोनाकाळात बालमजूर म्हणून झालेले दिसून येते. काही शाळाबाह्य मुलींचे अकाली विवाह झाले आहेत. नियमित शाळेत येणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची अक्षम्य हेळसांड होत असताना शाळाबाह्य बालकांना आपण कधीकाळी शाळेत होतो, हे देखील आठवत नाही.

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांनी राज्याचे आणि एकंदरीत देशाचे झालेले नुकसान, भंग पावलेले सामाजिक स्थैर्य आणि पूर्णत: निरक्षर होऊन शालेय प्रवाहातून बाहेर फेकले गेलेले विद्यार्थी ही अपरिमित अशी शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रीय हानी आहे. आता लवकरच शाळा सुरू करून ६ ते १८ वयोगटातील बालकांचे शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक पुनर्वसन करण्याची नितांत आवश्यकता आहे. या पिढीचे न भरून निघणारे नुकसान आता विनाविलंब थांबायला हवे.

- डॉ. गोविंद नांदेडे, माजी प्राथमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य

फोटो - शाळाबाह्य