शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

Pune: कॅन्टोन्मेंट विलिनिकण प्रक्रिया अंतिम टप्प्यात; संरक्षण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय समिती गठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 10:53 IST

६२ कँटोन्मेंट बोर्ड नजिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विलीन करण्यासंदर्भात अध्यादेश काढला होता...

लष्कर (पुणे) : देशातील कॅन्टोन्मेंट बोर्ड नजिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया संरक्षण मंत्रालयाने गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये आता खऱ्या अर्थाने अंतिम टप्यात आली आहे. राज्यातील औरंगाबाद, देहूरोड, देवळाली या कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी ७ सदस्यीय समितीची नुकतीच घोषणा संरक्षण मंत्रालयाच्या सचिव राजेश कुमार सहा यांनी अधिकृत पत्रक पद्धत केली असून पुणे आणि खडकीसारख्या महत्वाच्या बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रक्रियेत कामचुकारपणा केल्याने यासंदर्भात समिती गठीत होऊ शकलेली नाही.

२३ मे २०२२ संरक्षण मंत्रालयाने देशातील ६२ कँटोन्मेंट बोर्ड नजिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विलीन करण्यासंदर्भात अध्यादेश काढला होता. त्यानंतर वेळोवेळी तब्बल चार स्मरणपत्र देखील संरक्षण मंत्रालयाने कॅन्टोन्मेंट बोर्ड, त्या जवळची स्थानिक स्वराज्य संस्था, आणि त्या राज्याचे सचिव यांना पाठवले होते. त्यास प्रतिसाद म्हणून हिमाचल प्रदेश येथील सहा कॅन्टोन्मेंट बोर्ड, हैद्राबाद येथील सिकंदराबाद बोर्ड यांनी तत्काळ महापालिका आयुक्त यांच्यासह बैठक घेत विलीनीकरण प्रस्ताव राज्य सरकार आणि संरक्षण मंत्रालयाच्या पाठवलं होता. यावर लगेच कृती करत संरक्षण मंत्रालयाने सात उचास्थरित अधिकाऱ्यांची समिती बनवून प्रत्येक्ष त्या त्या कॅन्टोन्मेंट मध्ये जाऊन पाहणी करून तत्काळ अहवाल दोन महिन्याच्या आत संरक्षण मंत्रालयाला देयाचे ठरले होते. 

संरक्षण मंत्रालयाने देशातील तब्बल २२ कँटोन्मेंट बोर्डसाठी सात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित केली असून त्यात संरक्षण मंत्रालयातील संयुक्त सचिव, ए  डी जी एल, राज्य शासनाचे अधिकारी, डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेट, डायरेक्टर्स कमांड, कँटोन्मेंट बोर्ड अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी असे प्रमुख असणारा आहेत. यात कॅन्टोन्मेंट बोर्डात देशातील सिकंदराबाद, अजमेर, नशिराबाद, शिलाँग, रामगड, मोरार, बाबीना, फतेगड, मथुरा, शहाजहानपूर, सागर, कानानोर, रानीखेत, अलमोरा, नैनीताल, डेहराडून, क्लेमेनटाऊन, रुरकी, अमृतसर, तर महाराष्ट्रातील औरंगाबाद, देहूरोड, देवळाली या कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी उच्च स्तरीय समिती गठीत केल्याने आता खऱ्या अर्थाने या बोर्डाचे विलीनीकरण अंतिम टप्यात आले आहे.

औरंगाबादच्या आयुक्तांनी सर्वप्रथम बोलावली होती बैठक -

संरक्षण मंत्रालयाच्या चौथा स्मरण पत्रानंतर ११ एप्रिल रोजी औरंगाबाद च्या महापालिका आयुक्तांनी औरंगाबाद कॅन्टोन्मेंट आणि पालिका यांनी संयुक्त बैठक बोलावत विलीनीकरण प्रक्रिया गतिमान केली होती. त्यानंतर लगेचच देवळालीसाठी नाशिक आयुक्त आणि देहूरोड साठी नगरपालिका सी ई ओ यांनी एकत्रित बैठक बोलावून तसा प्रस्ताव राज्य सरकार व संरक्षण मंत्रालयाच्या पाठवलं होता आणि त्याचाच परिणाम संरक्षण मंत्रालयाने सात उच्च स्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित केल्याचे अधिकृत घोषणा पत्रक काढून केली आहे.

पुणे ,खडकी बोर्ड मागे का?

पुणे महापालिकेचे आयुक्त यांनी मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात राज्य शासन व संरक्षण मंत्रालयाने प्रस्ताव पाठवण्यासाठी बैठक बोलावली होती. त्याला पुणे कॅन्टोन्मेंटच्या सीईओंनी दांडी मारली होती. तर खडकीचे सीईओ उपस्थिती होते मात्र दोन्ही बोर्डाकडून कागदपत्रे आणि माहिती न मिळू शकल्याने आजच्या यादीत कॅन्टोन्मेंटची नावे नाहीत.

१५ ऑगस्टला विलीनीकरण घोषण होऊ शकते -देशातील कॅन्टोन्मेंटमध्ये काम करणारे अधिकारी, विलीनीकरण करण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते यांच्यातील चर्चेनुसार देशातील खुद्द प्रधानमंत्री यांनी स्वतः लक्ष घातल्याने विलीनीकरण अंतिम टप्प्यात आले असून प्रधानमंत्री मोदी १५ ऑगस्ट रोजी देशातील कॅन्टोन्मेंट बोर्ड बारखस्तची घोषणा करतील अशी माहिती हिमाचल प्रदेश येथील कार्यकर्त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAurangabadऔरंगाबादdehuroadदेहूरोडKhadkiखडकी