शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पीक घेता नाही आलं अन् घरातलं धान्यही गेलं, आता जगायचं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 06:19 IST

होते नव्हते ते सारे संपले : शिरूर तालुक्यातील वयोवृद्ध जोडप्यापुढे प्रश्न

श्रीकिशन काळे 

पुणे : ‘‘चार-पाच एकर शेतीत यंदा पीक घ्यायचे होते. पण पावसानं सर्व पाणी फेरलंय. कारण शेतात पाणी असल्याने खूप गवत वाढलंय. त्याला दुरूस्त करायला पैसेही नाहीत. घरात असलेलं पोतंभर धान्यही भिजल्यानं ते टाकून द्यावं लागलं. आसरा नसल्याने दोन-तीन शेळ्यांही मेल्यात. आता जगायचं तरी कसं ? हातात दमडी नाय आण शेतात पीक नाय ?,’’ हे हृदयाला पिळवटून टाकणारे बोल सत्तरीत असलेल्या गीताबाई काळे यांचे आहेत. त्या त्यांचे धनी माणिक काळे यांच्यासोबत शेतात जीवन जगत आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात चव्हाणवाडी हे छोटंसं खेडे आहे. त्यामध्ये सत्तर-ऐंशी वर्षांचे जोडपे आपली गुजराण शेती आणि शेळीपालन करून करत आहेत. त्यांनाही या पावसाने यंदा चांगलाच फटका दिला आहे. माणिक काळे आणि गीताबाई काळे हे जोडपे एकमेकांचे आधार असून, ते दोघे शेतातच पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. यंदा त्यांना पावसामुळे शेतात पीक घेता आले नाही. सात-आठ शेळ्याही पाळून त्यावर गुजराण करीत आहेत. पावसाने यंदा त्यांचे आर्थिक गणितच कोलमडून गेले आहे. घरात असलेले धान्य पाण्याने भिजून गेले. शेळ्यांना योग्य आसरा नसल्याने पावसात दोन-तीन शेळ्यांनी आपला जीव गमावला. दोघांनाही आता इकडून-तिकडून मागून पोटाची खळगी भरावी लागत आहे. कारण त्यांची मुले त्यांच्यासोबत राहत नाहीत. शेतात तर काहीच राहिले नसल्याने अन्न विकत घ्यायलाही पैसे नाहीत. परिणामी त्यांच्यावर भीक मागायची वेळ आली आहे.

पावसाने आहे ते संपवलंय...सुनीता भोसले या ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या असून, त्या म्हणाल्या, हे दोघेही स्वत: कमवून आयुष्य जगणारे जोडपे आहे. परंतु, यंदा पावसाने त्यांना झोडपले आहे. त्यांच्याकडे ना शेतात काही आहे, ना घरात. त्यांच्यावर आता भीक मागायचीच पाळी आली आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी