शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

पीक घेता नाही आलं अन् घरातलं धान्यही गेलं, आता जगायचं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 06:19 IST

होते नव्हते ते सारे संपले : शिरूर तालुक्यातील वयोवृद्ध जोडप्यापुढे प्रश्न

श्रीकिशन काळे 

पुणे : ‘‘चार-पाच एकर शेतीत यंदा पीक घ्यायचे होते. पण पावसानं सर्व पाणी फेरलंय. कारण शेतात पाणी असल्याने खूप गवत वाढलंय. त्याला दुरूस्त करायला पैसेही नाहीत. घरात असलेलं पोतंभर धान्यही भिजल्यानं ते टाकून द्यावं लागलं. आसरा नसल्याने दोन-तीन शेळ्यांही मेल्यात. आता जगायचं तरी कसं ? हातात दमडी नाय आण शेतात पीक नाय ?,’’ हे हृदयाला पिळवटून टाकणारे बोल सत्तरीत असलेल्या गीताबाई काळे यांचे आहेत. त्या त्यांचे धनी माणिक काळे यांच्यासोबत शेतात जीवन जगत आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात चव्हाणवाडी हे छोटंसं खेडे आहे. त्यामध्ये सत्तर-ऐंशी वर्षांचे जोडपे आपली गुजराण शेती आणि शेळीपालन करून करत आहेत. त्यांनाही या पावसाने यंदा चांगलाच फटका दिला आहे. माणिक काळे आणि गीताबाई काळे हे जोडपे एकमेकांचे आधार असून, ते दोघे शेतातच पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. यंदा त्यांना पावसामुळे शेतात पीक घेता आले नाही. सात-आठ शेळ्याही पाळून त्यावर गुजराण करीत आहेत. पावसाने यंदा त्यांचे आर्थिक गणितच कोलमडून गेले आहे. घरात असलेले धान्य पाण्याने भिजून गेले. शेळ्यांना योग्य आसरा नसल्याने पावसात दोन-तीन शेळ्यांनी आपला जीव गमावला. दोघांनाही आता इकडून-तिकडून मागून पोटाची खळगी भरावी लागत आहे. कारण त्यांची मुले त्यांच्यासोबत राहत नाहीत. शेतात तर काहीच राहिले नसल्याने अन्न विकत घ्यायलाही पैसे नाहीत. परिणामी त्यांच्यावर भीक मागायची वेळ आली आहे.

पावसाने आहे ते संपवलंय...सुनीता भोसले या ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या असून, त्या म्हणाल्या, हे दोघेही स्वत: कमवून आयुष्य जगणारे जोडपे आहे. परंतु, यंदा पावसाने त्यांना झोडपले आहे. त्यांच्याकडे ना शेतात काही आहे, ना घरात. त्यांच्यावर आता भीक मागायचीच पाळी आली आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी