शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

एमपीएससीद्वारे परीक्षा घेण्यासाठी परीक्षार्थी जाणार न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 02:06 IST

क्राऊड फंडिंग उभारणार : खासगी एजन्सीमार्फत परीक्षा नको

पिंपरी : आरोग्य विभागाची नुकतीच झालेली परीक्षा रद्द करावी, १६ हजार पदे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरावी, या मागणीसाठी परीक्षार्थी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. न्यायालयीन खर्चासाठी परीक्षार्थी पुढे येत असून, त्यांनी न्यायालयीन खर्चासाठी पाऊण लाख रुपये उभारले आहेत.

आरोग्य विभागाने विविध पदांसाठी २८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी परीक्षार्थींकडून करण्यात येत आहे. मात्र, आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोळा हजार पदे भरण्याची घोषणा केली आहेत. त्यातील १२ हजार पदे खासगी कंपन्यांच्यामार्फत भरण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांमार्फत परीक्षा घेण्यास परीक्षार्थींचा तीव्र विरोध आहे. खासगी कंपन्यांचा कारभार पारदर्शक नाही. त्या परीक्षेत घोटाळे झाल्याचे उघड झाले आहे. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरतीत असेच घोटाळे झाले होते. त्याचे पुरावे गोळा केले आहेत. न्यायालयात हे सर्व मुद्दे मांडले जातील. ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीप्रमाणेच ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीच्या परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. 

खासगी कंपन्यांवर विद्यार्थ्यांचा विश्वास नाही. उलट २८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या परीक्षेतील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यानंतरही पुन्हा खासगी कंपनीमार्फत भरती केली जाणार असल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.- महेश घरबुडे, विद्यार्थी समन्वय समितीखासगी कंपनीचे एजंट येऊन आम्हालाही विद्यार्थी पास करून देण्याचा प्रस्ताव देत असतात. परीक्षेत पारदर्शकता येण्यासाठी ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीची पदभरती एमपीएससीमार्फत करावी.-सतीश वसे, एमपीएससी शिक्षक, औरंगाबाद

फडणवीस सरकारने महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतलेल्या तलाठी, वनसंरक्षक आशा १७ हजार जागांच्या भरतीत घोटाळा झाला होता. नुकत्याच झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेतही गैरप्रकार झाले. त्यामुळे लवकरच भरली जाणारी सोळा हजार पदे एमपीएससीमार्फत घेण्याची मागणी करणार आहोत.- नील गायकवाड, परीक्षार्थी, बुलडाणा 

 

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षा