शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

....तर पायरसी थांबवता येईल : मकरंद अनासपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:10 IST

सध्याच्या काळात सामान्य माणसाला मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणे परवडत नाही. त्यामुळे कमीत कमी रुपयांत चित्रपट उपलब्ध करून दिला पाहिजे .

ठळक मुद्दे चित्रपट निर्मिती करत असताना चांगल्या कथेची निवड करणे फार महत्वाचे. तालुका स्तरावर चित्रपटगृहांची निर्मिती होणे गरजेचे.

पुणे :  मराठी चित्रपट सृष्टीने मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनी सारखा विचार करायला हवा आहे. कमीत कमी रुपयांत रसिकांना चित्रपट आपण रसिकांना उपलब्ध करून दिले पाहिजेत तर पायरसी थांबवता येईल असे मत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या वतीने मराठी चित्रपट निर्मात्यांची एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच पुण्यात करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ वात्रटिकाकार व दिग्दर्शक रामदास फुटाणे, सतीश रणदिवे, मेघराजराजे भोसले, अभिनेते मंगेश देसाई, मकरंद अनासपुरे, महेश मांजरेकर, संजय ठुबे, अण्णा देशपांडे, संचालिका निकिता मोघे, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर तसेच २०० हून जास्त चित्रपट निर्मात्यांनी सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने कथानिवड, चित्रीकरण, पोस्ट प्रोडक्शन, वितरण, सॅटेलाईट राईट्स, मार्केटिंग सबसिडी, पब्लिसिटी आदी विषयांवर चित्रपट क्षेत्रातील मातब्बर मंडळी यांच्याकडून सखोल चर्चा करण्यात आली. त्यावेळी ‘जाहिरात व प्रसिद्धी आणि सोशल मीडिया याविषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यामध्ये अनासपुरे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर, सौमित्र पोटे, नितीन वैद्य, मयूर रानडे यांनी सहभाग घेतला. अनासपुरे म्हणाले की सध्याच्या काळात सामान्य माणसाला मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणे परवडत नाही. त्यामुळे कमीत कमी रुपयांत चित्रपट उपलब्ध करून दिला तर त्याची पायरसी आपणाला थांबवता येईल.      पहिल्या सत्रात'कथेची निवड ते चित्रीकरणाला सुरवात'या विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत दिग्दर्शक आदित्य सरपोतदार,संजय जाधव, गजेंद्र अहिरे, सुप्रसिद्ध लेखिका मनीषा कोरडे व कार्यकारी निर्माते संजय ठुबे यांनी यात सहभाग घेतला. आदित्य सरपोतदार म्हणाले, चित्रपट निर्मिती करत असताना चांगल्या कथेची निवड करणे फार महत्वाचे आहे. यांनी मालामाल विकली, बिल्लू, वोडका डायरी असे अनेक चित्रपटांचे लेखन केलेल्या प्रसिद्ध लेखिका मनीषा कोरडे यांनी चित्रपट दर्जेदार बनविण्यासाठी चांगली कथा असणे महत्वाचे असल्याचे सांगितले.     तिस-या सत्रामध्ये आॅस्कर अकॅडमीचे ज्यूरी व सदस्य उज्वल निरगुडकर म्हणाले, मराठी चित्रपट आॅस्करपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. उत्तम निर्मितीबरोबर चित्रपटाचा विषय देखील महत्त्वाचा आहे याकडे लक्ष वेधले. तर शेवटच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, तालुका स्तरावर चित्रपट गृहांची निर्मिती होणे गरजेचे आहे. तर निर्माते वैभव जोशी यांनी चित्रपट निर्मिती करताना आर्थिकदृष्टया विचार करावा असे सांगितले.महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी चित्रपट महामंडळ सदैव पाठीशी उभे राहील, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज काझी, सौमित्र पोटे, अमोल परचुरे, संजय ठुबे, मंगेश नगरे यांनी केले.  

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाMahesh Manjrekarमहेश मांजरेकर