शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भाईचा बर्थडे! तलवारीने केक कापणारी टोळकी वाढली; वाढदिवसाचा 'मुळशी पॅटर्न' ठरतोय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:47 IST

‘भाई का बड्डे वाजले बारा’ असे म्हणत मित्रपरिवाराचे वाढदिवस थाटात करण्याची संस्कृती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.

भिगवण : ‘भाई का बड्डे वाजले बारा’ असे म्हणत मित्रपरिवाराचे वाढदिवस थाटात करण्याची संस्कृती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये भर रस्त्यावर तलवारीने केक कापणाऱ्या टोळक्याची संख्या अधिक आहे. वाढदिवसाच्या आनंदी वातावरणात गटातटातील वाद उफाळून आल्याने अनेक ठिकाणी वातावरण गंभीर झाल्याचेही प्रसंग घडतात. त्यामुळे पोलिसांनी याकडे पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिक करीत आहेत.आपल्या मित्राचा वाढदिवस सर्व मित्रमंडळीना हि आनंदाची पर्वणीच असते. मात्र ,या वाढदिवस साजरा करण्याची फॅड शहरात मोठ्या प्रमाणावर होती. त्याची बीजे आता ग्रामीण भागात रुजण्यास सुरवात झाल्याचे दिसून येत आहे. भिगवण परिसरात रात्री बारा वाजले आणि तोफा आणि फटाक्याचा आवाज सुरु झाला कि कोणाचा तरी वाढदिवस आहे, हे समजून येते.स्टंटबाजीतुन वाढदिवस साजरे करण्याची विकृती घुसत असल्याचे दिसून येत आहे. ‘बर्थ डे बॉय’ च्या डोक्यात अंडी फोडणे, केक नाकातोंडात भरविणे अशा पद्धतीने सुरवात होते. १०० च्या वर असणाºया तोफांचे आवाज काढण्यात येतात. यावेळी किती वाजलेत याचा विचार न करता डीजे च्या आवाजात धुंद होवून तरुणाचा घोळका मोठ्या प्रमाणावर गोंधळ करताना दिसून येतो. तर आज काल दादाचा ग्रुप ,भाऊचा ग्रुप असे एक ना अनेक ग्रुप गाड्यांचा ताफा घेवून मोठ्या संख्येने वाढ दिवस साजरा करताना गर्दी करताना दिसून येतात. वाढदिवसाच्या वेळी काही जण तर केक कापण्यासाठी तलवारीचा वापर होत असल्याचा तक्रारी नागरिक करीत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक काम करणाºया तरुणांची संख्याही कमी नाही.काहीजण आपल्या वाढदिवसा दिवशी पिडीत आणि वंचित बालकांना सुविधा पुरवून वाढदिवस साजरा करताना आढळून येतात.येथील पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तरुणांनी असे वाढदिवस साजरा करताना सामाजिक जबाबदारीचे भान राखण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच वाढ दिवस साजरा करताना तलवारीचा वापर केल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करीत आर्मअ‍ॅकट अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.न्यायालयाचा अवमान तरी पोलीस शांतरात्री दहानंतर वाद्य वाजविणे, फटाके फोडणे यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तरी देखील वाढदिवसाच्या रात्री बारा वाजता वाद्य वाजवून फटाके फोडले जातात. त्यामुळे न्यायालयाचा अवमान खुलेआम होतो आहे. मात्र तरीदेखील पोलीस कोणाच्या तक्रारीची वाट पाहतात हे समजत नाही. वास्तविक सुमोटो पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आवश्यक असताना तशी कारवाई केली जात नाही.

टॅग्स :Puneपुणे