शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

अलविदा रत्नागिरी हापूस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 14:36 IST

हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात मागली तीन आठवड्यांपासून सामान्यांच्या आवाक्यात भाव आले होते़.

ठळक मुद्देओखी वादळामुळे रत्नागिरी हापूसची आवक तुलनेत कमी कर्नाटकमध्येही यंदा हवामानातील बदलामुळे आंब्याच्या उत्पादनात घट

पुणे: यंदाचा रत्नागिरी हापूसचा हंगामा अखेर संपला असून, सध्या शिल्लक असलेल्या मालाची विक्री केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पुणेकर रत्नागिरी हापूसच चव चाखत होते. दर वर्षीच्या तुलनेत यंदा रत्नगिरी हापूसची आवक अवघी २० ते ३० टक्के इतकीच राहिली. यामुळे ऐन हंगामात देखील रत्नागिरी आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला नाही. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात मागली तीन आठवड्यांपासून सामान्यांच्या आवाक्यात भाव आले होते़ याबाबत आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, गेल्या आठवड्यापासून बाजारात रत्नागिरीची आवक तुरळक प्रमाणात सुरु होती. परंतु, रविवारी ही आवक पूर्णपणे बंद झाली. ओखी वादळामुळे रत्नागिरी हापूसची आवक तुलनेत कमीच राहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कर्नाटक हापूसचाही हंगाम उशिरा सुरु झाला आणि कर्नाटकमध्येही यंदा हवामानातील बदलामुळे आंब्याच्या उत्पादनात घट झाली़. रविवारी कर्नाटक हापूसची वीस हजार पेट्यांची आवक झाली असून आणखी दहा दिवस कर्नाटक हापूसचा हंगाम सुरु राहील अशी माहिती व्यापारी रोहन उरसळ यांनी व्यक्त केली़.गावरान हापूसला मागणी वाढलीगावरान हापूस आंब्याची आवक वाढली असून नागरिकांकडून मागणीही चांगली आहे. रविवारी मार्केटयार्डात हवेली आणि मुळशी तालुक्यातील गावातून नैसर्गिकरित्या पिकविलेल्या गावरान हापूसची १०० क्रेट इतकी आवक झाली़ प्रत्येक क्रेटमध्ये ७ डझन आंबे असतात़ प्रतिडझन आंब्यास दोनशे रुपये भाव मिळाला़ गावरान हापूस आंबा नैसर्गिक रित्या पिकविलेला असल्यामुळे चवीला गोड आहे़  येत्या आठवड्यात आणखी आवक वाढेल असा अंदाज व्यापारी तात्या कोंडे यांनी व्यक्त केला़ गावरान हापूसचा हंगाम ३० जुनपर्यंत सुरु राहील असेही त्यांनी सांगितले़

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाRatnagiriरत्नागिरीKarnatakकर्नाटकMarket Yardमार्केट यार्ड