शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

"...पण तो अस्वस्थ आत्मा माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी" शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 18:16 IST

मोदी सरकारच्या विरोधात गेले म्हणून त्यांनासुद्धा यांनी तुरुंगात टाकले आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात ही हुकूमशाही सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेदरम्यान म्हटले आहे...

ओतूर (पुणे) : एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हटले होते की, मी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो आणि काल म्हणतात की, महाराष्ट्रामध्ये ४५ वर्षांपासून एक आत्मा भटकत आहे आणि तो आत्मा अस्वस्थ आहे. हे खरं आहे; पण तो अस्वस्थ आत्मा माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात ही हुकूमशाही -

मोदी सरकारच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे. ती जनतेच्या हितासाठी वापरायची असते. ती लोकशाहीची जबाबदारी आहे; पण हे अधिकाराचा गैरवापर करीत असून लोकशाहीमध्ये एकमेकांवर टीका करण्याचा अधिकार आहे; पण हे त्यांना तुरुंगात टाकत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे काम चांगले होते ते पाहण्यासाठी भारताबाहेरून लोक यायचे; पण ते मोदी सरकारच्या विरोधात गेले म्हणून त्यांनासुद्धा यांनी तुरुंगात टाकले आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात ही हुकूमशाही सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेदरम्यान म्हटले आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांनी घेतला मोदी सरकारचा समाचार

खासदारकीची निवडणूक ही माझी राहिली नाही, तर ती माझ्या सर्वसामान्य जनतेने हाती घेतली आहे. माझ्या शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये देत आहे, असे गौरवोद्गार विरोधी नेते काढत आहेत. मग आमच्या कांद्याची निर्यात बंद केली. एकरामागे साडेतीन लाखांचे नुकसान केले आणि कुठल्या सहा हजारांचे कौतुक सांगताय? दुधाचे दर ३८ वरून २२ वर आणले. खतांवर १८, तर शेती औजारांवर १२ टक्के जीएसटी भरतोय माझा शेतकरी. आता या सरकारला त्यांची जागा दाखवा. देशाचे पंतप्रधान प्रचारासाठी शिवजन्मभूमी, पुणे जिल्ह्यात येतात; पण दहा वर्षांत त्यांना छत्रपतींच्या जन्मस्थळी नतमस्तक व्हायला यावंस वाटत नाही, असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या खास शैलीत लगावला.

ओतूर येथे जल्लोषात ओतूर येथे शरदचंद्र पवार यांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातला बुलंद आवाज शरद चंद्र पवार अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पवार साहेब यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रचार सभा ओतूर येथील मार्केट यार्डमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली ग्रामसभेतील बहुसंख्येने ग्रामस्थ, महिला भगिनी, तरुणवर्ग, ज्येष्ठ नागरिक आल्यामुळे ओतूरमध्ये जनसागर उसळला की काय असे चित्र पाहायला मिळत होते. यावेळी सत्यशील शेरकर, अशोक पवार, बाळासाहेब दांगट, दिलीप ढमढेरे, सुरेश भोर, जगन्नाथ शेवाळे, शरद लेंडे, वैभव तांबे, विशाल तांबे, अनंतराव काकडे, अनिल तांबे, गुलाब पारखे, सुरेखा वेठेकर, रंगनाथ घोलप, सुदाम घोलप, जोत्स्ना महाबरे, तुळशीराम मेहेर, सूरज वाजगे, तुषार थोरात, मोहित ढमाले, माऊली खंडागळे, संभाजी तांबे, अंकुश आमले, देवदत्त निकम, रोहिदास शिंदे, प्रभाकर शिंदे, अनिल मेहेर, बबन थोरात, अशोक घोलप, बाबू पाटे, किशोर दांगट आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दिव्या शिंदे, मोहन बांगर, अंकुश आमले, बाबा परदेशी, नवनाथ पोपळे, मयूर दौंडकर, सुरेखा वेठेकर, शरद चौधरी, दादाभाऊ बगाड, दीपक लवांडे, तुषार थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक एल. जी. थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पाटील व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सूत्रसंचालन गणेश मोडवे यांनी केले. आभार सत्यशील शेरकर यांनी मानले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेshirur-pcशिरूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४