शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे उद्योगधंद्यानी बदलावे : अरविंद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 18:05 IST

कोणत्याही औद्योगिक क्षेत्राचा कणा हा संशोधनावर अवलंबून असतो...

पुणे: प्रगत तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काही वर्षात ईलेक्ट्रीक वाहनांचा वापर देशात होईल. परंतु, त्याही पुढील २० ते २५ वर्षात हायड्रोजनवर वाहने चालतील. कोणत्याही औद्योगिक क्षेत्राचा कणा हा संशोधनावर अवलंबून असतो. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे उद्योगधंद्यानी बदलणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी केले.   इंडस्ट्री अ?ॅकॅडमीया सहयोग समिती आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित ह्यइंडकॉनह्णया एकदिवसिय (इंडस्ट्री अ?ॅकॅडमीया कॉन्क्लेव्ह) परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री अरिवंद सावंत बोलत होते. यावेळी ब्लू स्टारचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती व न्युट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स प्रा.लि.चे अध्यक्ष नानिक रूपानी,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एस.परशूरामन, प्र.कुलगुरू डॉ.श्रीहरी होनवाड, सौरभ शहा, प्रविण पाटील,डॉ. प्रसाद खांडेकर आदी उपस्थित होते. अरविंद सावंत म्हणाले, स्मार्ट सिटीसाठी पाणी, वीज आणि परिवहनाची योग्य सुविधा प्रत्येकाला मिळायला हवी. त्यासाठी औद्योगिक क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थेबरोबरच इतरांनी सुध्दा ही जवाबदारी उचलणे गरजेचे आहे. शैलेश हरीभक्ती म्हणाले,कोणत्याही कंपनीच्या प्रगतीसाठी संशोधनाची आवश्यकता असते.भविष्यात न्यूक्लियर पॉवर व एनर्जी क्षेत्रात संधी आहेत. त्यामुळे कंपन्या व शैक्षणिक संस्थांनी काळाची पाऊले ओळखून त्यानुसार संशोधन करावे.कार्यक्रमात राहुल कराड, नानीक रूपानी यांनी मनोगत व्यक्त केले.परिषदेदरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि नामवंत कंपन्या दरम्यान सामजस्य करार झाला.प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक तर गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.----------------------------------आर्थिक मंदी, वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र शासन आवश्यक पाऊले उचलत आहे,असेही अरविंद सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेArvind Sawantअरविंद सावंतbusinessव्यवसायMIDCएमआयडीसी