शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे उद्योगधंद्यानी बदलावे : अरविंद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 18:05 IST

कोणत्याही औद्योगिक क्षेत्राचा कणा हा संशोधनावर अवलंबून असतो...

पुणे: प्रगत तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काही वर्षात ईलेक्ट्रीक वाहनांचा वापर देशात होईल. परंतु, त्याही पुढील २० ते २५ वर्षात हायड्रोजनवर वाहने चालतील. कोणत्याही औद्योगिक क्षेत्राचा कणा हा संशोधनावर अवलंबून असतो. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे उद्योगधंद्यानी बदलणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी केले.   इंडस्ट्री अ?ॅकॅडमीया सहयोग समिती आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित ह्यइंडकॉनह्णया एकदिवसिय (इंडस्ट्री अ?ॅकॅडमीया कॉन्क्लेव्ह) परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री अरिवंद सावंत बोलत होते. यावेळी ब्लू स्टारचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती व न्युट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स प्रा.लि.चे अध्यक्ष नानिक रूपानी,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एस.परशूरामन, प्र.कुलगुरू डॉ.श्रीहरी होनवाड, सौरभ शहा, प्रविण पाटील,डॉ. प्रसाद खांडेकर आदी उपस्थित होते. अरविंद सावंत म्हणाले, स्मार्ट सिटीसाठी पाणी, वीज आणि परिवहनाची योग्य सुविधा प्रत्येकाला मिळायला हवी. त्यासाठी औद्योगिक क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थेबरोबरच इतरांनी सुध्दा ही जवाबदारी उचलणे गरजेचे आहे. शैलेश हरीभक्ती म्हणाले,कोणत्याही कंपनीच्या प्रगतीसाठी संशोधनाची आवश्यकता असते.भविष्यात न्यूक्लियर पॉवर व एनर्जी क्षेत्रात संधी आहेत. त्यामुळे कंपन्या व शैक्षणिक संस्थांनी काळाची पाऊले ओळखून त्यानुसार संशोधन करावे.कार्यक्रमात राहुल कराड, नानीक रूपानी यांनी मनोगत व्यक्त केले.परिषदेदरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि नामवंत कंपन्या दरम्यान सामजस्य करार झाला.प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक तर गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.----------------------------------आर्थिक मंदी, वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र शासन आवश्यक पाऊले उचलत आहे,असेही अरविंद सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेArvind Sawantअरविंद सावंतbusinessव्यवसायMIDCएमआयडीसी