शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांमुळे उद्याेग- व्यवसायांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 20:26 IST

देशभरातील गणेशोत्सवाच्या अर्थकारणाचा अभ्यास केला असता 20 हजार कोटींचा व्यवसाय असलेला उत्सव म्हणून समाेर येत अाहे. इतकेच नव्हे तर दरवर्षी या आकडेवारीत 20 ते 30 टक्यांनी वाढ होते.

पुणे :  लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेतील विविध उद्योगव्यवसायांना चालना मिळणार आहे. बदलत्या काळानुसार उत्सवाने देखील गेल्या काही वर्षांपासून कात टाकलेली पाहवयास मिळते. गणेशोत्सव हा केवळ एका धर्मापुरता उत्सव नसून या उत्सवाच्या औचित्याने इतर सर्वधर्मातील अर्थकारणाला तितकाच वेग येतो.         तीन वर्षापूर्वी दिल्लीतील एका संस्थेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील गणेशोत्सवाच्या अर्थकारणाचा अभ्यास केला असता त्यांनी 20 हजार कोटींचा व्यवसाय असलेला उत्सव म्हणून उल्लेख केला होता. इतकेच नव्हे तर दरवर्षी या आकडेवारीत 20 ते 30 टक्यांनी वाढ होते. असे संशोधन करणा-या संस्थेचे म्हणणे आहे. त्यानुसार आकडेमोड करायची झाल्यास यंदाचा गणेशोत्सव किमान 40 हजार कोटींचा आहे. अर्थव्यवस्थेला चालना देवून त्यात प्रचंड बदल घडवून आणण्यात गणेशोत्सवाचा वाटा मोठा आहे. मंडप, सजावट, मिरवणूक , विद्युत रोषणाई, देखावे, धार्मिक विधी आणि अहवाल वाटप यांचा खर्च अनिवार्य असून अद्याप या बाबींवरील खर्च कमी करण्यास कुठलेही मंडळ सहजासहजी तयार होत नसल्याचे दृश्य पाहवयास मिळते. मंडळाचे स्वरुप व त्यांचा खर्च याविषयीची आकडेवारी सांगायची झाल्यास मध्यम स्वरुपाच्या मंडळाचा सजावटीवरील खर्च साधारण पाच ते दहा लाखांपर्यत आहे. तर मोठ्या मंडळाचा सजावटीचा खर्च पंधरा ते वीस लाखांपर्यत जातो. मध्यम स्वरुपातील एका गणेश मंडळाचा संपूर्ण उत्सवाचे बजेट किमान दहा ते पंधरा लाखांपर्यत असून मोठ्या गणेश मंडळांचा खर्च हा दुप्पट / तिप्पट असल्याचे पाहवयास मिळते. 

       गणेशोत्सवाची गंगोत्री म्हणून पुण्याचा उल्लेख करावा लागेल. नोंदणीकृत मंडळांची संख्या 4700 असून तेवढीच मंडळे अनोंदणीकृत आहेत. या आकडेवारीच्या चौपटीने शहरातील हौसिंग सोसायटीमध्ये उत्सव साजरा होतो. याशिवाय प्रत्येक शाळेत देखील उत्सव आनंदाने साजरा केला जातो.45 लाख वस्तीच्या पुणे शहरात किमान 4 लाख घरांमध्ये गणरायाचे आगमन होते. याचा किमान खर्च दोन ते तीन हजार रुपयांच्या आसपास असून याप्रमाणे विचार केल्यास शहरातील गणेशोत्सवातील अर्थकारणाची व्याप्ती कळुन येईल. असे सराफ सांगतात. 

सामाजिक समरसता व समाजपयोगी अर्थकारण जपणारा उत्सव 

 सामाजिक समरसता व समाजपयोगी अर्थकारण जपणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाचा उल्लेख करावा लागेल. उत्सवाकरिता लागणारी विड्याची पाने शुक्रवार पेठेतील तांबोळी समाज विकतो. श्रीं च्या मुर्तीपुढे जी पाच फळे ठेवावी लागतात त्यासाठी बागवान बांधवांकडे जावे लागते. तर सजावटीचे सामान घेण्यासाठी रविवार पेठेतील बोहरी आळीत जावे लागते. एकूणच हा उत्सव सामाजिक समरसता जपून समाजपयोगी अर्थकारण करणारा उत्सव आहे. - आनंद सराफ (गणेशउत्सवाचे अभ्यासक) 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवbusinessव्यवसाय