शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एकवीरा यात्रेतील तरुणाच्या निर्घृण खूनाप्रकरणी आरोपीला सशर्त जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 11:14 IST

त्या प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला...

पुणे : एप्रिल २०२२ मध्ये एकवीरा देवीच्या यात्रेत किरकोळ वादातून चार जणांनी मिळून एका तरुणाचा निर्घृण खून केला होता. त्या प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. अजय प्रवीण पाटील आणि समाधान डी. पाटील, असे जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणात मनोज पाटील याचा नाहक बळी गेला. सर्व आरोपी हे रायगड जिल्ह्यातून एकवीरा देवीच्या यात्रेसाठी आले होते. मनोज पाटील व त्याचे इतर मित्र हे सुद्धा एकवीरा देवीच्या यात्रेसाठी ठाणे जिल्ह्यातून आले होते. गर्दीत फिर्यादीच्या मित्राचा मोबाइल चोरीला गेला असता त्यांनी आरोपींकडे विचारणा केली. त्यावरून दोन्ही गटांत वादावादी सुरू झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी मनोज पाटील याच्या छातीत गुप्ती खुपसून त्याला गंभीर जखमी केले. हे पाहून फिर्यादी व त्याचे इतर मित्र तेथून पळून गेले. लोणावळा पोलिस ठाण्यामध्ये आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली.

आरोपी अजय पाटील आणि समाधान पाटील यांनी ॲड. शुभांगी परुळेकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. ही घटनाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाहिली आहे, तसेच आरोपीकडून रक्ताने माखलेली हत्यारे जप्त केलेली आहेत. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना ओळखपरेडमध्ये ओळखले आहे, या आणि अन्य कारणास्तव आरोपीला जामीन देण्यात येऊ नये, असा जोरदार युक्तिवाद सरकार पक्षाने केला होता. ॲड. परुळेकर यांनी उच्च न्यायालयात आरोपीची बाजू मांडताना, अजय पाटील आणि समाधान पाटील यांचा गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आहे, तसेच ओळख परेड ही नियमांचे पालन न करता घेतली गेली आहे, अशा महत्त्वाच्या बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने आरोपीला सोडण्याचा आदेश दिला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालय