शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘बीआरटी’चे थांबे असुरक्षित : अस्वच्छता व अन्य लोकांच्या वावरामुळे दुरावस्था 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 20:04 IST

जलद गतीने बस प्रवास होण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बीआरटी मार्ग सुरू केले आहे.

ठळक मुद्देमार्गांवर धावणाऱ्या बसवर पीएमपीच्या नियंत्रण कक्षातून नियंत्रण इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) यंत्रणाच बंद पडल्याने हे काम ठप्प

पुणे : कोट्यवधी रुपये खर्च करून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात उभारलेले बीआरटी मार्ग बस प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत आहेत. मार्गातील बहुतेक सर्व थांब्याचे दरवाजे सताड उघडे असल्याने प्रवासी धोकादायक पध्दतीने बसची वाट पाहत उभे राहत आहेत. थांब्यांमधील डिजिटल फलक बंद असल्याने प्रवाशांना बसचा ठावठिकाणा समजत नाही. अनेक थांब्यांमध्ये अस्वच्छता व अन्य लोकांच्या वावरामुळे थांब्यांची दुरावस्था झाली आहे. जलद गतीने बस प्रवास होण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बीआरटी मार्ग सुरू केले आहे. पुण्यातील संगमवाडी ते विश्रांतवाडी हा एकमेव पुर्ण मार्ग सुरू आहे. तर नगर रस्त्यावरील बीआरटी अर्धवट स्थितीत आहे. पिंपरी चिंचवडमधील मार्गांची ही अवस्था आहे. सध्या सुरू असलेल्या बीआरटी मार्गांची स्थिती फारशी चांगली नाही . या मार्गांवर धावणाऱ्या बसचे उत्पन्न इतर मार्गांवरील बसच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. प्रवाशांकडूनही या मार्गांना चांगला प्रतिसाद मिळतो. पण मार्गांच्या देखभाल-दुरूस्तीकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या मार्गांवर धावणाऱ्या बसवर पीएमपीच्या नियंत्रण कक्षातून नियंत्रण ठेवले जात होते. पण इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) यंत्रणाच बंद पडल्याने हे काम ठप्प झाले आहे.स्थानकांवर बसची माहिती देणारी डिजिटल फलक बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसची माहिती मिळत नाही. बसथांब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविले आहेत. पण ही यंत्रणा बंद असल्याने दरवाजे सताड उघडे असतात. बस येण्यापुर्वी प्रवासी या ठिकाणी धोकादायक पध्दतीने बस वाट पाहत असतात. हा दरवाजा रस्त्यापासून काही फूट उंच आहे.  बीआरटी मार्गापासून पुढे मुख्य रस्ता ओलांडताना आजही प्रवाशांना जीव मुठीत धरून जावे लागते. सुरक्षेच्यादृष्टीने तिथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा निर्माण केलेल्या नाहीत. थांब्याच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. थांब्याची स्वच्छताही केली जात नाही. मार्गांमध्ये होणारी इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यात अपयश येत आहे. त्यामुळे बीआरटी बसचा वेगही मंदावला आहे. .......बीआरटी दरवाजाची स्वयंचलित यंत्रणा बंद करून सुरक्षा कर्मचाºयांमार्फत चालवली जाते. हे  कर्मचारी कायम दरवाजे उघडे  ठेवत आहेत. त्यामुळे  प्रवाशांची अडचण होत आहे व सुरक्षिततेचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे. यासंदर्भात असंख्य तक्रारी करूनही पीएमपी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पीएमपी व महानगरपालिका प्रशासन एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच जागे होणार का? अशा अकार्यक्षम अधिकाºयांवर कारवाई व्हायला हवी. - संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच

  

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे