शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

एका "शानदार" पोलीस अधिकाऱ्याचा 'दिमाखदार' निरोप समारंभ! अधिकारी, कर्मचारी झाले भावुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 21:46 IST

ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना निरोप

ठळक मुद्दे पोलीस उपमहानिरीक्षकपदी बढतीवर नागपूरला बदली झालेले संदीप पाटील यांचा निरोप समारंभ

पुणे : सरकारी अधिकारी म्हटलं की बदली नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम,राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना,तुमची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक..यांसारख्या बऱ्याच गोष्टी तुमची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात. अन पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते. अशाच एका 'दबंग आणि जिगरबाज'अधिकाऱ्याच्या निरोप समारंभ चर्चेचा विषय ठरला. निमित्त होते पोलीस उपमहानिरीक्षकपदी बढतीवर नागपूरला बदली झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा मंगळवारी (दि. ८ ) झालेला निरोप समारंभ... एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अशाप्रकारे जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम पुणे जिल्ह्यात प्रथमच झाला.. 

गेली २ वर्षे संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलाचा कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढविण्याबरोबरच जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तसेच भीमा कोरेगावच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्याला महत्व दिले होते. त्यामुळे नागरिकांबरोबरच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात ते लोकप्रिय झाले होते. संदीप पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नाही. उपअधीक्षक विवेक पाटील यांच्याकडे पाटील यांनी कार्यभार दिला. त्यानंतर जिल्ह्यातून आलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी पाटील यांच्या वाहनाला दोर लावून तो ओढत आवारात एक फेरी मारली. त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. याप्रसंगी अनेक अधिकारी भावुक झाले होते.

काम करण्यासाठी गडचिरोली ला बदली मागून घेणारा 'दबंग आणि जिगरबाज' अधिकारी... 

बदली करून गडचिरोलीला जाण्यास सहसा पुणे-मुंबईत रुळणाऱ्या अधिकाऱ्यांची शक्यतो मानसिकता नसते. पण पुण्यातून आपली बदली करण्यात आली नसून आपण ती मागून घेतली आहे, असे सांगणारे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणून वेगळे अधिकारी वाटतात. याबाबत पाटील म्हणतात, पाच वर्षांपूर्वी गडचिरोलीत असताना छोट्या कामांना सुरुवात केली होती. तेथे काम करण्यास अधिक वाव असल्याने आपण बढतीवर जाताना गडचिरोली परिक्षेत्र म्हणून मागून घेतली. पुस्तक भेट योजनेचा चांगला प्रतिसाद मिळाला़ तेथे भरपूर काम करण्यास वाव आहे. त्यामुळे आपण गडचिरोलीला पसंती दिली. 

पुण्यातील कार्यकाळाबद्दल बोलताना संदीप पाटील म्हणाले, पुणे ग्रामीण येथे २ वर्षापूर्वी आलो, तेव्हा कोरेगाव भीमा येथे आदल्या वर्षी दंगल झाली होती. त्यामुळे यंदा देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोक येणार, त्यातून काही अघटित घडणार अशी भीती व्यक्त केली जात होती. पोलिसांचे मनोबलही खालावले होते़ २०१९ मध्ये ते सर्वात मोठे आव्हान होते़ देशभरातील मिडियाचे त्याकडे लक्ष होते. मोठा बंदोबस्ताबरोबरच सर्वांना विश्वासात घेऊन १ जानेवारीचा कार्यक्रम शांततेत पार पडल्याने देशभर चांगला संदेश गेला.

६६ गुन्हेगारी टोळ्यांवर मोकासह विविध प्रतिबंधक कायद्यांचा वापर करुन त्यांच्यावर नियंत्रण आणले. पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न केला़ बारामती येथे उपमुख्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. पोलिसांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या़ पुणेकरांनीही आपल्या प्रयत्नांना चांगली साथ दिली.

खरंतर महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस महासंचालकांना निवृत्तीच्या वेळी अशा प्रकारे समारंभातून निरोप दिला जातो. मात्र, बढतीवर बदली झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याला जिल्ह्यात अशा अनोख्या पद्धतीने प्रथमच जाहीर निरोप समारंभ झाला. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTransferबदली