शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मळद येथे कॅनॉलवरील पूल खचला , ग्रामस्थांची गैरसोय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:54 IST

मळद (ता. दौंड)येथे गावाला जोडणाºया खडकवासला कॅनालवरील पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, मळद गावाला जोडणारा हा पुल मुख्य मार्ग असल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.

कुरकुंभ : मळद (ता. दौंड)येथे गावाला जोडणाºया खडकवासला कॅनालवरील पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, मळद गावाला जोडणारा हा पुल मुख्य मार्ग असल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. वाहतूक बंद असतांनाही येथूनही दुचाकीस्वार या मार्गाने जात आहे. तर मोटार चालक मळद येथील रेल्वेच्या जुन्या नँरोगेज मार्गावरून धोकादायक पद्धतीने वापर करत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याआधी मुख्य पुलाची पुर्नबांधणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पुणे-सोलापूर महामार्गा लगत असणाºया मळद गावातून खडकवासला कॅनॉलची बांधणी १९८३ च्या सुमारास करण्यात आली होती. त्याच दरम्यान मळद गावाला रहदारीसाठी या कॅनॉलवरून पुलाची बांधणी करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलावरून आजपर्यंत वाहतूक सुरु आहे. या दरम्यान मळद गावाची वाढलेली लोकसंख्या व रहदारीची बदललेली साधने यामुळे दिवसेंदिवस या पुलाची अवस्था खराब झाली आहे. मात्र पुलाच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे.मळद या गावाच्या सभोतालच्या परिसरातून हा कँनाल गेला आहे. यामुळे येथे जाणारा प्रत्येक नागरिक हा या कँनाल वरूनच जातो. या ठिकाणी जवळपास चार जागेवरती पुल बांधण्यात आले आहेत. त्यापैकी मळद गावाठानाला जोडणारा मुख्य पुल, प्राथमिक शाळेला जोडणारा दुसरा पादचारी पुल व रणवरे वस्तीला जोडणारा पुल असे तीन पुल बांधण्यात आले आहेत. हे पुल सिमेंटचे आहेत. चौथा पुल हा भंडलकर वस्ती येथे असून तो लोखंडी आहे. या चारही पुलांची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे. यामुळे या पुलांची बांधणी करणे गरजेचे आहे. मळद ग्रामपंचायतने २०१५ साली खडकवासला शाखा रावणगाव उपभियांता दौंड यांना लेखी पत्राद्वारे दिलेली होती. मात्र, याबाबत कुणीच दखल घेतली गेलेली नाही. प्राथमिक शाळेजवळ असणा-या पुलावरून रोज शालेय मुलांची व परिसरातल्या नागरिकांची वर्दळ असते. पर्यायी मार्ग नसल्याने जीव मुठीत धरूनच त्यांना प्रवास करावा लागतो.भंडलकर वस्ती वरील लोखंडी पुलाची देखील अवस्था अत्यंत बिकट आहे. मात्र काहीच पर्याय नसल्याने नागरिक याचा उपयोग करतात. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार खडकवासला कँनालचे अधिकारीच असतील यात शंका नाही त्यामुळे याची वेळीच गंभीर दखल घेवून नव्याने पुल बांधने आवश्यक आहे.मळदला जोडणारा मुख्य मार्ग बंद झाल्याने वाहतुकीची अतिशय गैरसोय होत आहे त्यातही पयार्यी मार्ग अतिशय अरुंद व कठडे नसल्याने तो अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे नवीन पुलाची बांधणी लवकरात लवकर करून मिळावी तसेच गावातील प्रत्येक पुल दुरुस्ती किंवा नव्याने बांधून दिला जावा यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली आहे.- महेश रणवरे, सरपंच मळद.मळद ग्रामपंचायतचे कुठलेही पत्र या आधी मिळाले नाही. पुलाला तडे गेले त्याच दिवशी या पुलाची पाहणी करून तात्काळ नवीन पुलाचे इस्टीमेट तयार करण्यासाठी वरिष्ठांना सांगितले आहे. लवकरच याचे पुनर्निर्माण केले जाईल सध्या या पुलावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे-साळुंके, सहायक अभियंता,खडकवासला दौंडमळद ग्रामपंचायतच्या (२७ आॅगस्ट १५)च्या सभेमध्ये या पुलाच्या नव्या बांधकामासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानुसार या धोकादायक पुलाच्या कामाकरिता खडकवासलाच्या रावणगाव शाखेत लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कुठल्याच अधिकाºयांनी याची पाहणी केली नाही. विशेष बाब म्हणजे या पत्राला त्यांच्या वरिष्ठांकडे देण्यातच आले नसल्याची बाब खुद्द सहायक अभियंता यांनी सांगितली. त्यामुळे शाखा अधिकारी कुठल्या प्रकारे काम करत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे .वाहतूक नँरोगेज वरून मळद येथून दौंड बारामती हा रेल्वे मार्ग गेलेला आहे. या पूर्वी येथे नँरोगेज रेल्वे रूळ होता. मात्र, आता तो ब्रॉडगेज करण्यात आला आहे. त्यामुळे या कँनाल वरील नँरोगेज रुळाचा छोटा पुल रिकामा आहे. सध्या अतिशय अरुंद व कठडे नसलेल्या या पुलावरून वाहतूक सुरु आहे. मात्र, ही वाहतूक अतिशय धोकादायक असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणे