शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

Chandni Chauk: ७० टनाचे रणगाडे जातील इतका मजबूत होता चांदणी चौकातील पूल

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: October 3, 2022 18:59 IST

आवश्यक तेवढेच स्टील वापरत बनवला होता चांदणी चाैकातील पूल

पुणे : चांदणी चौकातील पूल तयार करताना त्यावरून एनडीएचे ७० टनांचे रणगाडे जातील, इतका मजबूत करण्याचे आम्हाला सांगितले हाेते. त्यानुसार आम्ही तो पूल बनविला होता. त्यासाठी खूप स्टील वापरल्याचे बोलेले गेले; पण तसे काहीही केलेले नाही. पुलाला जेवढे स्टील आवश्यक असते, त्यानुसारच ते वापरले, असे स्पष्टीकरण चांदणी चौकातील पूल बांधणारे सिव्हिल इंजिनिअर व डिझायनर सतीश मराठे (वय-७६) यांनी सांगितले.

मोठा गाजावाजा होऊन चांदणी चौकातील पूल पाडण्यात आला. या पार्श्वभूमीवर हा पूल बांधणारे सतीश मराठे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ज्यांना हा पूल पाडायचा होता, त्यांना ते नीट जमले नाही, त्यामुळेच ते खोटं बोलत आहेत, असेही मराठे म्हणाले.

पुलाचे काम आमच्याच मार्फत

मी आणि माझे भागीदार मित्र अनंत लिमये आम्ही दोघांनी बरली इंजिनिअर्स नावाची कंपनी होती. त्या पुलाचे डिझाइन मीच केले होते. केंद्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ते काम आमच्याच मार्फत केले होते. तेव्हा कुलकर्णी आणि देशपांडे नावाचे सरकारी इंजिनिअर होते. त्यांनीदेखील प्रामाणिकपणे काम केले. मी आणि अनंत लिमये दोघांनी १९८२ ते २००२ दरम्यान २५ पूल बांधले आहेत. त्यात पुणे विभागात अधिक आहेत. कोल्हापूर, सातारा, नाशिक, निफाड येथे पण बांधले आहेत. निफाड येथील शंभर मीटरचा पूल, तर शंभर दिवसांत बांधला.

सतीश मराठे म्हणाले...

- साधारण १९९२ साली आम्ही आळंदीचा पूल बांधला आहे. तेव्हा पुलावरून पाणी जाईल, हे आम्हाला सांगितले नव्हते; कारण तेव्हा पूररेषा खूप खाली होती. आता पुलावरून पाणी जातेय, तरी तो उभा आहे.

- मागे म्हात्रे पुलाजवळील रस्ता खचला होता; पण पूल पडला असे बोलले गेले. पूल आणि रस्ता यांच्यात जमीन-आस्मानचा फरक आहे.

आम्ही आमचा व्यवसाय बंद केला...

पीडब्लूडीकडील पैसे संपल्यानंतर त्यांनी पीपीपीअंतर्गत तुम्ही बांधा, पैसे खर्च करा आणि मग टोलद्वारे पैसे घ्या, अशी योजना जाहीर केली. तेव्हा एकदम ३०० ते ४०० कोटी रुपये जमा करणे शक्य नव्हते. मग आम्ही आमचा व्यवसाय २००२ पासून बंद केला.

आता पुलाचे आयुष्य निम्म्यावर !

मी १९७० मध्ये इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. तेव्हा आम्हाला एका पुलाचे आयुष्य १०० वर्षे असल्याचे सांगितले गेले. माझ्या मुलाने पदवी घेतली तेव्हा त्याला पुलाचे आयुष्य ५० वर्षांचे असते, असे सांगितले. कोणाला नफा किती जास्त हवा, त्यावर सर्व ठरतं. चांगलं काम करूनही नफा मिळतो. ज्यांना अधिक हवा असतो, ते मग चोरीचे काम करतात.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnda puneएनडीए पुणे