शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

ब्रेनडेड झालेल्या १४ वर्षीय मुलाचे केले अवयवदान; शाहूनगर येथील दाम्पत्याचा आदर्शवत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 10:35 IST

पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याने खचलेल्या आई- वडिलांनी दु:ख बाजूला सारत त्याचे अवयव दान केले. त्यामुळे सात जणांवर अवयव प्रत्यारोपण करण्यात आले...

- नारायण बडगुजर

पिंपरी : दोन मित्र एका दुचाकीवरून जात असताना अपघात घडला. यात दुचाकीचालक मित्राचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले. सात दिवस उपचारांची शर्थ झाली. मात्र, मेंदू निकामी (ब्रेन डेड) होऊन त्याचा मृत्यू झाला. पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याने खचलेल्या आई- वडिलांनी दु:ख बाजूला सारत त्याचे अवयव दान केले. त्यामुळे सात जणांवर अवयव प्रत्यारोपण करण्यात आले.

अक्षत सचिन लोहाडे (१४), असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. अक्षत याचे वडील सचिन लोहाडे हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत, तर आई सुवर्णा ही विमा प्रतिनिधी आहे. मोठी बहीण विधी हिने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. अक्षत हा इयत्ता नववीत शिकत होता. मूळचे औरंगाबाद येथील असलेले सचिन लोहाडे काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आले. कुटुंबासह ते शाहूनगर येथे वास्तव्यास आहेत. मुलगा अक्षत याला चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांची धडपड होती.

अक्षत हा २५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याच्या एका मित्रासोबत दुचाकीवरून जात होता. त्यावेळी दुचाकीला अपघात घडला. दुचाकी चालवत असलेल्या मित्राचा जागीच मृत्यू झाला. अक्षत गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मेंदू निकामी झाला. काहीही करा; पण आमच्या अक्षतला बरे करा, अशी आर्त विनवणी आई सुवर्णा यांनी डाॅक्टरांनी केली. मात्र, उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अक्षतचे अवयवदान केल्यास समाजाला मोठा संदेश देता येईल. काही जणांचे आयुष्य बचावू शकते, तसेच काही जणांना अपंगत्वावर मात करता येईल, असे सांगत मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. अमित पांडे यांनी समुपदेशन केले. त्यानंतर अक्षतचे अवयव दान करण्याचा आई- वडिलांनी निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी सकाळी अवयवदान करण्यात आले.

‘आता कोणाला राखी बांधायची?’

अक्षत हा रुग्णालयात ‘ब्रेनडेड’ अवस्थेत असताना बहीण विधी हिने त्याला राखी बांधली. लाडक्या असलेल्या लहान भावाला दरवर्षी मोठ्या आनंदात राखी बांधत होती. मात्र, यंदा रक्षाबंधनला मोठे दु:ख ओढावले. यापुढे कोणाला राखी बांधायची, असे म्हणत बहीण विधी हिने दु:ख व्यक्त केले.

अवयवदान करून लोहाडे कुटुंबीयांनी समाजाला संदेश दिला आहे. दु:ख बाजूला सारून इतरांच्या आयुष्याचा विचार केला आहे.

-जितेंद्र छाबडा, संभाजीनगर, चिंचवड (सुवर्णा लोहाडे यांचे मामा)

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड