शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नीरेचे प्रदूषण न रोखल्यास निवडणुकांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:35 IST

ग्रामस्थांचा संताप : बारामतीतील सात गावांचा एकमुखी निर्णय

सांगवी : बारामती तालुक्यातील सात गावांनी नीरा नदीचे प्रदुषण न रोखल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. सांगवी (ता. बारामती) येथे पार पडलेल्या ग्रामसभेला शेकडो ग्रामस्थ व शेतकरी यावेळी उपस्थित होते.नीरा नदीच्या होत असणाऱ्या प्रदूषणाबाबत नदी काठच्या जवळपास सात आठ गावांतील संतप्त नागरिकांनी सांगवी ( ता.बारामती ) येथे बुधवारी (दि. २०) विशेष ग्रामसभेत विविध ठराव करण्यात आला. नदी प्रदुषणाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणाºया प्रशासन व स्थानिक नेते मंडळींना यावेळी चांगलेच धारेवर धरले. नीरा नदीचे प्रदुषण न रोखल्यास येणाºया लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा आक्रमक निर्णय घेतला आहे. हे प्रदुषण रोखण्यासाठी प्रतीसंघर्ष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सोमवारी ( दि.२५) बारामती फलटण राष्ट्रीय महामार्गावरील नीरा नदीच्या पुलावर आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. या ग्रामसभेत सांगवी, कांबळेश्वर, शिरवली, खांडज, नीरावागज, सोनगाव, सांगवी ( ता.फलटण ) येथील विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित राहून प्रदूषण नियंत्रक विभाग व स्थानिक नेते मंडळींच्या विरोधात आवाज उठवला.

ग्रामस्थांसह पाटबंधारे विभागाने देखिल याबाबत प्रशासनाला तोंडी, लेखी निवेदनाद्वारे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, तरी देखिल काही केल्याविना नीरा नदीचे प्रदूषण मुक्त होण्यापासून थांबत नाही. या नदीत बारामती तालुक्यासह, फलटण तालुक्यातील साखर कारखाने, खासगी दूध संघ, कत्तलखान्यातून रात्रीच्या वेळी हे पाणी सोडण्यात येत असते, यामुळे पाण्याचा उग्र वास येऊन पाणी काळेकुट्ट होत आहे. खांडज येथील ग्रामस्थांनी प्रयोगशाळेत नदीच्या पाण्याची तपासणी केली आहे. यावेळी पाण्यात तपासणी दरम्यान मॅग्नेशिअम अ‍ॅसीड, सल्फेड, व क्लोरीनचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. नदीच्या प्रदुषणामुळे शेजारील विंधन विहिरींचे पाणी देखील दुषीत झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

शेतातील पिके जळून जाऊन, जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आली आहेत. तर पिके जळून कर्जबाजारीपणा अंगलट येत असून, जनावरांच्या पिण्यात हे पाणी आल्यास जनावरे दगाऊ शकतात, यामुळे याची भरपाई कोण देणार असा सवाल शेतक?्यांनी उपस्थित केला आहे. पाण्यावर हजारो मृत माशांचा खच तरंगत आहे.यामुळे येथील मच्छीमारांच्या देखिल पोटापाण्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे.यामुळे वषार्नुवर्ष नदी काठचे हजारो शेतकरी चिंतेत असून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळ कारवाई करण्या ऐवजी मोठ्या प्रमाणातपैसे घेऊन कारवाई टाळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला आहे. यावेळी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना राहुल तावरे , अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा युवराज तावरे पाटील, सरपंच हेमलता तावरे, उपसरपंच प्रमोद शिपकूले,नितीन आटोळे, भानुदास जगताप, तंटा मुक्ती अध्यक्ष विलास तावरे, स्वाती तावरे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी बनकर, महेश तावरे, अंकुश तावरे, महेंद्र तावरे, पोपट तावरे, प्रकाश तावरे, नंदू नगरे, अर्जुन काळे, हनुमंत तावरे,ग्रामसेवक आर.पी.पवार, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कायदेशीर मार्गाने लढणार; ग्रामस्थांचा निर्धारकंपनी, खासगी कारखाने यांच्या विरोधात कायदेशीर मार्गाने दावा दाखल करणार आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन, रास्ता रोको, मोर्चा काढून, येणाºया लोकसभा मतदानावर नदी काठच्या ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर स्थानिक खासदार, आमदार यांनी लक्ष घालून सभागृहात प्रश्न मांडला तर प्रश्न यावर मार्ग निघेल परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करून आता थेट लोकसभा मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक नेते मंडळींपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.४याबाबत मच्छिमार संघटनेनी याला पाठिंबा दिला आहे. संबंधित कारखाने व खासगी कंपनी यांच्याकडून प्रदूषण नियंत्रक विभागाला भरमसाट पैसे पुरवले जात असतात यामुळे कारवाई करण्या अगोदरच प्रदूषण विभाग संबंधिताना सूचना करून पळवाटा काढल्या जाऊन पुन्हा नव्याने हे पाणी सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुन्हा नव्याने पाणी सोडण्यात येते असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.फलटण नगरपरिषदेला ठोठावला दंडफलटण पासून नीरा नदी पर्यंत जे काही सांडपाणी जात आहे, त्याबाबत आम्ही सर्व्हे केलेला आहे, त्यानुसार फलटण नगरपरिषदे कडून सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे आढळून आले होते. त्यांच्यावर २५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मागील दोन महिन्यांपासून फलटण येथील कत्तलखाना बंद आहे. ‘लोकमत’चे वृत्त प्रसिध्द झाल्यानुसार ओढ्यात सांडपाण्याचा एक थेंब देखील सोडता कामा नये, असे फलटण तालुक्यातील खासगी कारखाने, दूध संघ यांना आदेश बजावले आहे.- बाबासाहेब कुकडेउपप्रादेशिक अधिकारीमहाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळ, सातारा

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणे