शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सीमेवरील गावांना मिळणार जवळच्या तालुक्यांमधून धान्य

By नितीन चौधरी | Updated: January 29, 2025 15:25 IST

वेळेत धान्य मिळण्यासाठी राज्यभर नियोजन; मार्चपासून अमंलबजावणी

पुणे : गेल्या चार महिन्यांपासून राज्यभर धान्य वितरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेकदा तालुक्याच्या गुदामातून त्याचा तालुक्यातील दूरवरच्या गावांना धान्य पोहोचण्यास होणारा विलंबही वितरणात अडथळा निर्माण करतो. तसेच दूरवर धान्य पोहोचविण्यासाठी लागणारा वेळही जास्त असतो. तसेच इंधनही मोठ्या प्रमाणावर खर्च होते. हे टाळण्यासाठी आता राज्यभरात धान्य वितरण सुकर व्हावे यासाठी तालुक्यांच्या सीमेवरील गावांना दुसऱ्या तालुक्यांमधील तसेच जिल्ह्यांमधील गुदामांमधून धान्य दिले जाणार आहे. मार्चपासून या निर्णयाची अमंलबजावणी होणार आहे. त्यापूर्वी अंमलबजावणीत अडचणी असल्यास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत. येत्या दोन तीन दिवसांत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.केंद्र सरकारच्या अन्नधान्य पुरवठा विभागाने सबंध देशातील धान्य वितरण सुकर व्हावे यासाठी वितरणात सुसूत्रता आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू असून, त्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची सोमवारी (दि. २७) ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाचे संचालक मातेश्वरी मिश्रा तसेच राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित होते. या बैठकीत सर्व जिल्ह्यांना हे नियोजन देण्यात आले आहे. त्यात एखाद्या तालुक्यातील सीमेवरील गाव दुसऱ्या तालुक्याच्या गुदामाशी अंतराने जवळ असल्यास तेथून या गावाचे धान्य वितरित केले जाणार आहे तर काही गावे अन्य जिल्ह्याच्या तालुक्यांजवळ असल्यासही त्या जिल्ह्यातून या गावांचे धान्य वितरित केले जाणार आहे. त्यानुसार सर्व तालुक्यांचे नियोजन करण्यात आले आहे.अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या या नियोजनानुसार एका तालुक्यातील काही गावे मात्र, दुसऱ्या तालुक्याच्या गुदामापासूनही दूर असल्याचे काही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही गावे त्याच तालुक्यात ठेवावीत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार हे अधिकारी आपला अभिप्राय अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे देणार आहेत. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन हे नियोजन अंतिम करण्यात येणार आहे.

मार्चचा धान्य कोटा वितरित करण्यासाठी या नियोजनाचा आधार घेतला जाणार आहे. सीमेवरील गावांना कोणत्या तालुक्याच्या गुदामांमधून धान्य वितरित केले जाईल याचा अभिप्राय येत्या दोन दिवसांत द्यायचा आहे. १ फेब्रुवारीला हे नियोजन अंतिम केले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील काही गावे ठाणे, रायगड, सोलापूर, जिल्ह्यांना जवळ आहेत. या गावांना तेथून धान्य पुरवठा केला जाईल. ग्राहकांना धान्य वेळेत मिळावे हा यामागील उद्देश आहे. - महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfoodअन्नMuncipal Corporationनगर पालिका