शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काळविटांच्या जिवाला अपघाताचा धोका , वाढत्या नागरीकरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 18:59 IST

पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या नान्नज, करमाळा आणि रेहकुरी येथे अनुक्रमे २५० ते ३०० च्या आसपास व ५०० काळविटे आढळतात. माळढोक पक्षी आणि काळवीट यांचे एक खास वैशिष्ट्य आहे.

ठळक मुद्देमागील चार  वर्षात २७ काळवीट मृत्युमुखी वाहनचालकांनी जबाबदारीची जाणीव ठेवावी

पुणे : भरधाव जाणारी वाहने, बेदरकार वाहनचालक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन...एकूणच कायदा-सुव्यवस्थेविषयीचा बेजबाबदारपणा काळविटांच्या जिवाशी खेळत आहे. वन्यजीव विभाग पुणेच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मागील ४ वर्षांत २७ काळविटे वाहन अपघातात मृत्यमुखी पडली आहेत. पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या  नान्नज, करमाळा आणि रेहकुरी येथे अनुक्रमे २५० ते ३००च्या आसपास व ५०० काळविटे आढळतात. माळढोक पक्षी आणि काळवीट यांचे एक खास वैशिष्ट्य आहे. या दोघांनाही गवताळ प्रदेश आवश्यक आहे. कमी पाण्याची आवश्यकता असल्याने ते सहजासहजी दिसतात. रानटी कुत्री, कोल्हे, लांडगे हे काळविटाचे नैसर्गिक शत्रू. पूर्वी जमिनीची सलगता असल्याने काळविटांचा वावर मोठ्या प्रमाणावर होता. आता तुकड्या-तुकड्यांत जमिनी शेतीसाठी उपयोगात आणल्यानंतर प्राण्यांचा वावर कमी झाला. जिथे माळढोक पक्षी, तिथे काळवीट आढळ्त असल्याची माहिती वनसंरक्षक वानखेडे यांनी दिली. दोघांनाही झुडपे, जंगल, पाणवठ्याची जागा आवडतात. काळविटाला ओरडता येत नसल्याने तो बºयाचदा आपल्यावरील संकटाची सूचना उंच उड्या मारून देतो. यामुळे इतर पक्षी व प्राणी सतर्क होतात. काळविटाला लांबचे दिसत असल्याने तो पळून जाऊन आपले संरक्षण करू शकतो. वाढते नागरीकरण, वाहनांची संख्या, बेजबाबदार वाहनचालक, भरधाव वाहने यामुळे काळविटे अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहिल्यास त्यात २०१३-१४ या काळात २, २०१४-१५ मध्ये ६, २०१५-१६मध्ये १५, २०१६-१७ मध्ये ४ काळविटे वाहन अपघातात मृत्युमुखी पडली. राज्यात नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील रेहकुरी, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि नान्नज येथे काळविटे मोठ्या प्रमाणावर आढळतात. ही तिन्ही अभयारण्ये पुणे वन्यजीव विभागांतर्गत येतात. 

................

* वाहनचालकांनी जबाबदारीची जाणीव ठेवावीउगीचच वेगाने वाहन चालविण्यापेक्षा संतुलित वेगाने वाहन चालविणे गरजेचे आहे. आपल्या चुकीमुळे निष्पाप वन्यप्राणी मरत असतील, तर दोष कुणाचा? प्राण्यांवर विसंबून राहण्यापेक्षा वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालवावे. बºयाच अपघातांचे कारण पाहिल्यास ते वाहनांचा वाढता वेग असल्याचे दिसून येईल. - रवींद्र वानखेडे (वनसंरक्षक वन्यजीव विभाग, पुणे) 

* कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. नागरिक, वाहनचालक यांनी वन्यजीवांविषयीच्या कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. वन्यजीव  कायद्यातील तरतुदी कठोर असून नागरिकांनी होणाºया शिक्षेचा विचार करावा. नियमांचा आदर राखल्यास निसर्ग, प्राणी आणि आपण यांच्यात संवाद राखण्यास मदत होईल. - रंगनाथ नाईकडे (वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, पुणे)  

टॅग्स :PuneपुणेforestजंगलAccidentअपघात