शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

काळविटांच्या जिवाला अपघाताचा धोका , वाढत्या नागरीकरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 18:59 IST

पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या नान्नज, करमाळा आणि रेहकुरी येथे अनुक्रमे २५० ते ३०० च्या आसपास व ५०० काळविटे आढळतात. माळढोक पक्षी आणि काळवीट यांचे एक खास वैशिष्ट्य आहे.

ठळक मुद्देमागील चार  वर्षात २७ काळवीट मृत्युमुखी वाहनचालकांनी जबाबदारीची जाणीव ठेवावी

पुणे : भरधाव जाणारी वाहने, बेदरकार वाहनचालक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन...एकूणच कायदा-सुव्यवस्थेविषयीचा बेजबाबदारपणा काळविटांच्या जिवाशी खेळत आहे. वन्यजीव विभाग पुणेच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मागील ४ वर्षांत २७ काळविटे वाहन अपघातात मृत्यमुखी पडली आहेत. पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या  नान्नज, करमाळा आणि रेहकुरी येथे अनुक्रमे २५० ते ३००च्या आसपास व ५०० काळविटे आढळतात. माळढोक पक्षी आणि काळवीट यांचे एक खास वैशिष्ट्य आहे. या दोघांनाही गवताळ प्रदेश आवश्यक आहे. कमी पाण्याची आवश्यकता असल्याने ते सहजासहजी दिसतात. रानटी कुत्री, कोल्हे, लांडगे हे काळविटाचे नैसर्गिक शत्रू. पूर्वी जमिनीची सलगता असल्याने काळविटांचा वावर मोठ्या प्रमाणावर होता. आता तुकड्या-तुकड्यांत जमिनी शेतीसाठी उपयोगात आणल्यानंतर प्राण्यांचा वावर कमी झाला. जिथे माळढोक पक्षी, तिथे काळवीट आढळ्त असल्याची माहिती वनसंरक्षक वानखेडे यांनी दिली. दोघांनाही झुडपे, जंगल, पाणवठ्याची जागा आवडतात. काळविटाला ओरडता येत नसल्याने तो बºयाचदा आपल्यावरील संकटाची सूचना उंच उड्या मारून देतो. यामुळे इतर पक्षी व प्राणी सतर्क होतात. काळविटाला लांबचे दिसत असल्याने तो पळून जाऊन आपले संरक्षण करू शकतो. वाढते नागरीकरण, वाहनांची संख्या, बेजबाबदार वाहनचालक, भरधाव वाहने यामुळे काळविटे अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहिल्यास त्यात २०१३-१४ या काळात २, २०१४-१५ मध्ये ६, २०१५-१६मध्ये १५, २०१६-१७ मध्ये ४ काळविटे वाहन अपघातात मृत्युमुखी पडली. राज्यात नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील रेहकुरी, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि नान्नज येथे काळविटे मोठ्या प्रमाणावर आढळतात. ही तिन्ही अभयारण्ये पुणे वन्यजीव विभागांतर्गत येतात. 

................

* वाहनचालकांनी जबाबदारीची जाणीव ठेवावीउगीचच वेगाने वाहन चालविण्यापेक्षा संतुलित वेगाने वाहन चालविणे गरजेचे आहे. आपल्या चुकीमुळे निष्पाप वन्यप्राणी मरत असतील, तर दोष कुणाचा? प्राण्यांवर विसंबून राहण्यापेक्षा वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालवावे. बºयाच अपघातांचे कारण पाहिल्यास ते वाहनांचा वाढता वेग असल्याचे दिसून येईल. - रवींद्र वानखेडे (वनसंरक्षक वन्यजीव विभाग, पुणे) 

* कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. नागरिक, वाहनचालक यांनी वन्यजीवांविषयीच्या कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. वन्यजीव  कायद्यातील तरतुदी कठोर असून नागरिकांनी होणाºया शिक्षेचा विचार करावा. नियमांचा आदर राखल्यास निसर्ग, प्राणी आणि आपण यांच्यात संवाद राखण्यास मदत होईल. - रंगनाथ नाईकडे (वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, पुणे)  

टॅग्स :PuneपुणेforestजंगलAccidentअपघात